पुणे: बसच्या अपघाताचे प्रमाण हल्ली वाढले आहे .दरम्यान पुण्यात देखील आज असाच एक भीषण अपघात झाला असून यात ३५ प्रवासी झाखमी झाले आहेत.पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दहिवडी डेपोची दहिवडी जोतिबा एसटी जोतिबाकडे चालली होती. तांदुळवाडीनजीक गुरव पुलाजवळ पुलावरून कठडा तोडून बस सरळ ओढ्यात कोसळली.यामुळे गाडीतील 35 प्रवासी जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केवळ प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणून प्रवाशांचे जीव वाचले आहेत.जखमींना कोल्हापूर येथील सीपीआर तसेच कृष्णा हॉस्पिटल तसेच प्रकाश मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.केवळ प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणून प्रवाशांचे जीव वाचल्याची प्रतिक्रिया दिली.दरम्यान, काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.घटनास्थळी इस्लामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण, कुरळप पोलीस स्टेशनचे विक्रम पाटील, कासेगाव पोलीस, शिराळा पोलीस जंगम स्टेशनचे पोलीस अधिकारी दाखल झाले.अपघातात एसटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.एसटीचा एक टायर निखळून बाजूला फेकला गेल्याचे दिसून येत आहे.