महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी १२ जणांचा मृत्यू

साधू आणि संत लोकांना संगमामध्ये न जाण्याचे आवाहन

गंगा मातेच्या प्रत्येक घाटावर स्नानाची व्यवस्था

भाविकांनी जवळच्या घटावर स्नान करावे

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आवाहन

प्रयागराज: प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात मध्यरात्री चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली आहे. महाकुंभाच्या मौनीअमावस्येपूर्वी प्रयागराजच्या संगम परिसरात चेंगराचेंगरी झाली. या अपघातात 12 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आहे.

अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय

विशेष खबरदारी घेत आखाडा परिषदेने अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. संगम परिसरातून लोकांना बाहेर काढण्यासाठी बॅरिकेडिंग हटवण्यात आले आहे. तथापि, संगम नदीच्या काठावर अजूनही लोकांची प्रचंड गर्दी आहे. चेंगराचेंगरीनंतरही लोक संगम किनाऱ्यावर कसे तरी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. साधू आणि संत लोकांना संगमामध्ये न जाण्याचे आवाहन करत आहेत.

कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नका

तर या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कुंभमेळ्यासाठी आलेल्या सर्व भाविकांनी कोणत्याही अफवांकडे लक्ष न देण्याचं आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केलं आहे.गंगा मातेच्या प्रत्येक घाटावर स्नानाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांनी जवळच्या घाटावर स्नान करावे. मुख्य संगमाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करू नये. स्नानाचा हा पवित्र सोहळा निर्विघ्न व सुरक्षितपणे पार पडण्यासाठी प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सर्व सुचनांचे पालन करा. कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नका.योगी आदित्यनाथ

error: Content is protected !!