एटीएम मधून पैसे काढत आहात; काय आहेत आरबीआय चे नवीन नियम

ब्युरो न्यूज: जर तुम्ही एटीएमचा वापर करून पैसे काढत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आरबीआय ने नवीन नियम केले आहेत.जर तुम्ही एटीएम मधून पैसे काढलात आणि पैसे आले नाहीत तर आणि तुमच्या बँक खात्यातून पैसे कट झाले तर बँक ला तुम्हाला दंड म्हणून पैसे द्यावे लागणार आहेत.

नेमके काय आहेत नियम?

तुम्ही एटीएममध्ये गेलात, पैसे काढण्याचा प्रयत्न केला, पण पैसे आले नाहीत, असे अनेकदा घडते आणि बँक खात्यातून मात्र पैसे कट होतात, त्यानंतर पैसे पुन्हा जमा होणार आहेत की नाही या बाबतची धाकधूक खातेदाराच्या मनात असतेच मात्र आता त्याची काळजी करण्याची गरज नाही,कारण जर बँकेने तुमचे पैसे पुन्हा खात्यात जमा केले नाहीत तर बँकेला दर दिवशी १०० रुपये दंड द्यावा लागणार आहे. आरबीआयने यासाठी कठोर नियम बनवले आहेत. कोणताही पैशाचा व्यवहार अयशस्वी झाल्यास, बँक मर्यादित कालावधीत रिफंड देते.पण, तसे न झाल्यास बँकेला दंड भरावा लागेल. बँकेला प्रतिदिन 100 रुपये दंड भरावा लागेल.

केव्हा परिपत्रक जारी केले?

RBI ने 20 सप्टेंबर 2019 रोजी एक परिपत्रक जारी केले होते, ज्यामध्ये TAT च्या बरोबरीने म्हणजेच टर्न अराउंड टाइम आणि ग्राहकांना भरपाई देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.आरबीआयच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही व्यवहारात बिघाड झाल्यास बँकेने डेबिट केलेले पैसे मुदतीच्या आत परत केले नाहीत तर बँकेला दंड भरावा लागेल.

बँक जितक्या दिवस उशीर करेल तितक्या दिवसांसाठी दंडाची रक्कम दररोज वाढेल.जर तुम्ही एटीएममध्ये व्यवहार केला आणि तुमच्या खात्यातून पैसे कापले गेले, परंतु रोख रक्कम काढली गेली नाही, तर बँकेला व्यवहाराच्या दिवसापासून पुढील 5 दिवसांत ते परत करावे लागेल, असे न केल्यास दररोज 100 रुपये दंड आकारला जाईल.

कार्ड टू कार्ड पेमेंट करत असाल तर?

जर तुम्ही कार्ड-टू-कार्ड ट्रान्सफर केले आणि व्यवहारावर तुमच्या खात्यातून पैसे कापले गेले परंतु लाभार्थीच्या खात्यात जमा झाले नाहीत, तर बँकेला T+1 सह एकूण दोन दिवसांच्या आत डेबिट रिव्हर्स करावे लागेल. म्हणजेच व्यवहाराचा दिवस आणि दुसऱ्या दिवशी या दोन दिवसांत पैसे परत करावे लागतील. असे न केल्यास रोज 100 रुपये दंड बँकेला भरावा लागेल.

error: Content is protected !!