बस तब्बल २०० फूट खोल दरीत कोसळली
रत्नागिरी: नाशिक जवळ सिन्नर येथे झालेल्या भीषण अपघातात रत्नागिरी येथील तिघांचा मृत्यू झाला आहे, कोकणात रत्नागिरी येथून महाकुंभमेळ्याला गेलेल्या भाविकांच्या गाडीला हा भीषण अपघात झाला आहे.तर यात तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.या भीषण अपघातात दुर्दैवीरित्या मृत्यू झालेल्यांमध्ये रत्नागिरी डीएड कॉलेजचे माजी प्राचार्य प्रताप सावंत देसाई यांचा समावेश आहे. याशिवाय चालक भगवान उर्फ बाबू झगडे व रत्नागिरी येथील हॉटेल व्यवसायिक अक्षय निकम यांचाही मृत्यू झाला.
काय आहे सविस्तर वृत्त?
एकूण सातजण महाकुंभमेळ्यासाठी रत्नागिरी येथून गेले होते. दरम्यान, परतत असताना नाशिक येथे झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे. हे सगळे रत्नागिरी खेडशी येथील रहिवासी होते. महाकुंभमेळ्यासाठी गेलेले यातील काहीजण एकमेकांचे नातेवाईक आहेत.रत्नागिरी माळ नाका येथील येथील डीएड कॉलेजचे माजी प्राचार्य प्रताप सावंत देसाई, निवृत्त शिक्षक रमाकांत पांचाळ, रत्नागिरी येथील मंदिराचे विश्वस्त संतोष रेडीज, सुप्रसिध्द ऑडीटर किरण निकम, त्यांचे चिरंजीव अक्षय निकम व नातेवाईक प्रांजल साळवी तसेच वाहन चालक भगवान तथा बाबू झगडे असे 7 जण प्रवास करीत होते. यापैकी तीन जणांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. किरण निकम यांची प्रकती गंभीर आहे तर संतोष रेडीज, रमाकांत पांचाळ व प्रांजल साळवी यांना काही प्रमाणात जखमा झाल्या परंतु त्यांची प्रकृती स्थिर आहे.रत्नागिरीतून कुंभमेळ्याला गेलेल्या भाविकांच्या गाडीला पहाटे झालेल्या भीषण अपघातात 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर आहे. तसेच या अपघातात आणखी तिघे जखमी झाले. या हादरवून सोडणाऱ्या अपघातात मंगलमूर्ती प्रतिष्ठानचे माजी सरचिटणीस निवृत्त प्राचार्य प्रताप सावंत देसाई, वाहन चालक भगवान झगडे व अक्षय निकम यांचे दुर्दैवी निधन झाले.
कधी झाला अपघात?
हा अपघात नाशिक जिल्ह्यातील सिन्नर जवळ पहाटे 4 वा. झाला आहे.खासगी बस तब्बल २०० फूट खोल दरीत कोसळली.या अपघातात 7 जण ठार झाले असून 15 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले.
हा अपघात इतका भीषण होता की या इनोव्हा गाडीचा चक्काचूर झाल्याचे पाहायला मिळत आहे. या भीषण अपघाताचे नेमके कारण अद्याप करू शकले नाही. मात्र सर्व भाविक कुंभमेळ्यातील शाही स्नान सोहळ्यानंतर इनोव्हा गाडीने रत्नागिरीला परत येत होते. समोरुन येणार्या डंपरने जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे गाडीचा पुढचा भाग पूर्णपणे चेपला गेला आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेले अक्षय निकम यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्यानंतर काही वेळाने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.महामार्गावरुन प्रवास करणार्या वाहन चालकांनी थांबून अपघातग्रस्तांना मदत केली दरम्यान हा सगळा गंभीर अपघात झाल्याचे कळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले.













