कणकवली : कणकवली शहरात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात रिगल कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, कणकवलीच्या बीसीए विभागातील विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या शिबिरात विद्यार्थिनींनी स्वतः रक्तदान करून सामाजिक भान आणि मानवतेचा संदेश दिला.
“तरुणाई ही समाजाची खरी शक्ती आहे” हे या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले. रक्तदानासारख्या पवित्र आणि जीवनदायी कार्यात सहभागी होत विद्यार्थिनींनी मानवतेचा आदर्श निर्माण केला. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या विचाराला कृतीतून साकार करत त्यांनी इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण घालून दिले.
या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग तसेच रक्तदान शिबिराचे आयोजक यांनी विद्यार्थिनींचे विशेष कौतुक केले. अशा सामाजिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, सहकार्याची भावना तसेच आरोग्याविषयी जागरूकता वाढते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

“रक्तदान शिबिरात रिगल कॉलेजच्या बीसीए विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग”
1
/
102
पंतप्रधानांना देशाच्या भविष्याची सर्वात जास्त काळजी - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
पंतप्रधानांच्या पात्रतेविषयी बोलून त्यांचा केलेला अवमान सहन करणार नाही - प्रभाकर सावंत
विरोधी पक्षाकडे चेहराच राहीलेला नाही म्हणून त्यांना "झुरळाचा" चेहरा घ्यावा लागला - आमदार प्रमोद जठार
NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ वेंगुर्ल्यात आंदोलन #vengurla #sindhudurg
एखादी मोठी कंपनी कोकणात आली नाही तर तरुणांच्या हाताला काम कसं मिळणार ?
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताह - अबिद नाईक #kankavli #ajitpawar
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Konkani Ranmanus #PrasadGawade
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Kokani Ranmanus
पालकमंत्री नितेश राणे यांच्या मुळेच 86 कोटीची आंबा-काजू विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात
पत्रकार शेखर सामंत यांनी सांगितला तो थरारक प्रसंग | Shekhar Samant #shekharsamant #tarunbharat
1
/
102

Subscribe










