कोकणात शिंदे आणि भाजपा चे नेते नॉट रिचेबल ?

अर्ज मागे घेण्याचा उद्याचा शेवटचा दिवस; नेमकी रणनीती काय?

ब्युरो न्यूज : कोकणात महायुतीचे वारे जोराने वाहत असेल तरी शिवसेनेचे बंडखोर उमेदवार आणि महायुती यांच्यातील जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.विधानसभा निवडणूक उमेदवारीचे अर्ज मागे घेण्याची उद्या दिनांक ४ नोव्हेंबर ही शेवटची तारीख असताना पालघरमधून मोठी बातमी समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेचे नेते श्रीनिवास वनगा हे तिकीट न मिळाल्यानं काही दिवसांपूर्वी नॉट रिचेबल झाले होते. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचा आणखी एक नेता जगदीश धोडी हे गेल्या तीन दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. जगदीश धोडी नॉट रिचेबल असतानाच आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे पालघर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले अमित घोडा हे आता गायब आहेत. अमित घोडा यांनी भाजपमधून बंडखोरी करत पालघर विधानसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र ते गेल्या दोन दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याची बातमी समोर आली आहे.

अर्ज मागे घेण्यासाठी वरिष्ठांचे फोन?

उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी त्यांची समजूत काढण्यासाठी सातत्यानं वरिष्ठांकडून फोन येत असल्यानं अमित घोडा हे नॉट रिचेबल झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे. शिवसेनेकडून यावेळी माजी खासदार राजेंद्र गावीत यांना पालघरमधून विधानसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. अमित घोडा यांनी बंडखोरी करत गावित यांच्याविरोधात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी त्यांनी बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांची देखील भेट घेतली होती.

error: Content is protected !!