कारवरील नियंत्रण सुटल्याने कणकवलीत भीषण अपघात

एकाचा मृत्यू तर; एकजण गंभीर जखमी

कणकवली : कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने मालवण ते कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या कारचा अपघात झाला. या अपघातात मयुरेश बाबाजी पेंडुरकर (रा. पेंडूर, वय ३२ याचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी सायंकाळी ६:३० वा. च्या सुमारास कणकवली तालुक्यातील वागदे डंगळवाडी येथे झाला. अपघातात चालक उदय बाबाजी पवार (रा. पेंडूर सध्या रा. नरडवे, वय ३२) हा जखमी झाला. अपघातात मृत्यू व जखमी झालेले उदय पवार व मयुरेश पेंडुरकर हे दोघे मालवण येथून कणकवलीच्या दिशेने येत होते. वागदे डंगळवाडी येथे आले असता, चालक उदय पवार याचे कार वरील नियंत्रण सुटले व कार रस्त्याच्या बाजूला गेली गटाराच्या दिशेने पलटी होत खाली गेली. अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी जखमींना खाजगी वाहनाने कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयुरेश याला तपासून मयत घोषित केले. तर चालक उदय पवार यांच्या नाकाला व मानेला किरकोळ दुखापत झाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. ज्ञानेश सावंत, वाहतूक पोलीस आर. के. पाटील, पोलीस नाईक शंकर पार्सेकर, भूषण सुतार आदी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. पुढील कार्यवाही करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

error: Content is protected !!