ब्युरो न्यूज: सध्याची परिस्थिती पाहता उष्णतेने उच्चांक गाठला आहे.अजून पूर्ण मे महिना बाकी असताना उष्णतेने कहर केलेला दिसून येत आहे. बदलते वातावरण आणि वाढता उष्मा यामुळे शेती बागायतीना नुकसानाला सामोरे जावे लागले आहे.अशाच एक सुखद वृत्त समोर आले आहे.भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदा देशात सरासरी पेक्षा जास्त पाऊसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 2025 मध्ये 105 टक्के पावसाचा अंदाज आहे.तसेच यावेळी 1 जूनच्या सुमारास केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता देखील भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
सरासरी किती पाऊस पडणार?
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रविचंद्रन यांनी मंगळवारी सांगितले की, दीर्घकालीन हवामान अंदाजानुसार, यावर्षी मान्सूनचा पाऊस सरासरीच्या 105% पर्यंत असू शकतो. भारतीय हवामान विभागानुसार या वर्षीच्या अंदाजानुसार काही प्रदेश वगळता देशातील बहुतेक भागांना अनुकूल पावसाच्या परिस्थितीचा फायदा होण्याची शक्यता आहे.