ब्युरो न्यूज: एकीकडे तापमानाचा उच्चांक वाढला असून दुसरीकडे ढगाळ वातावरण यामुळे कोकणातील बागायतदार हवालदिल झाले असतानाच आता आस्मानी संकट दार ठोठावत आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकणपट्ट्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा 29 आणि 30 मार्च रोजी देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत यावेळी कोरडं किंवा ढगाळ वातावरण राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुण्यात गारवा राहील, तर काही भागात पावसाच्या तुरळक सरी बरसतील. कोल्हापूर, घाटमाथ्यावर मात्र ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.सातारा आणि घाटमाथ्यावर देखील 29 आणि 30 मार्च रोजी पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे.
चार चाकी वाहन नाही तरीही लाडक्या बहिणींना पैसे मिळणे बंद
सांगली, सोलापूरमध्येही पाऊस पडेल. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीडमध्ये हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्रात वातावरण कोरडं राहणार आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात मागच्या 24 तासात 38 ते 40 डिग्री तापमानाची नोंद अनेक जिल्ह्यांमध्ये करण्यात आली आहे. तर पुढचे तीन दिवस तापमान वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.













