बारावीच्या मराठीच्या पेपर मध्ये तब्बल १४ चुका

परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ

बेळगाव: दहावी बारावीच्या परीक्षा चालू झाल्यापासूनच कॉपी मुक्त परीक्षेचा कितीही आटापिटा केला तरी फज्जा उडालाच. दरम्यान सध्या बारावीच्या परीक्षा चालू आहेत.मंगळवारी झालेल्या बारावी मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत अनेक चुका असल्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला आहे. तसेच १४ प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारण्यात आल्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाल्याची माहिती परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांनीच दिली.

मराठी विषयाच्या पेपरची प्रश्नपत्रिका तयार करताना योग्य ती काळजी घेण्यात आलेली नाही. तसेच प्रश्न विचारताना अनेक चुकीचे शब्द वापरण्यात आले.त्यामुळे पेपरला सुरुवात झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. मात्र प्रश्नपत्रिकेत चुका असून परीक्षा काळात याबाबत कोणाकडेही तक्रार करता आली नाही, अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली.

काय आहेत चुका?

‘जवाहरलाल’ या शब्दाऐवजी ‘जव्हार’, ‘माळावरल्या हिला सुरेख नजरांना मिळाला आहे’, ‘कवी अमर शेख ही मुद्दा धोक्यात आहे’ असे म्हणतात. ‘विश्वाहून’ या शब्दाची विभक्ती, ‘पसायदान या संतांने लिहिलेले’ आहे, यांसह एकूण १४ प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारण्यात आले आहेत.यापूर्वी एखाद्या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुकीचे प्रश्न विचारण्यात आले,

ग्रेस गुण मिळणार नाहीत ?

तर प्रश्नपत्रिकातील चुकांबाबत विद्यार्थ्यांना वाढीव गुण देण्यात येत होते. मात्र सरकारने यापूर्वीच विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत ग्रेस गुण दिले जाणार नाहीत, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुका असल्या तरी वाढीव गुण मिळणार असल्याने विद्यार्थ्यांची अडचण होणार आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिका चुका राहणार नाहीत, याची काळजी प्रश्नपत्रिका छपाईवेळी घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!