सकल हिंदू समाजाची मागणी
कुडाळ : शुल्लक कारणावरून पर्यटकांना मारहाण करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सकल हिंदू समाजाकडून करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी कुडाळ पोलिसांकडे सुपूर्त केले आहे.
काल सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास झाराप झिरो पॉईंट येथे रुपेश सपकाळ (कात्रज, पुणे) या पर्यटकाने पिण्यासाठी चहा मागितली. या चहामध्ये माशी असल्याचे त्याला आढळून आले. यावेळी रुपेश यांनी दुकानदाराकडे चहा बदलून मागितला. परंतु दुकानदाराने चहा बदलून दिला नाही. त्यामुळे रुपेश यांनी चहाचे पैसे देण्यास नकार दिला. या गोष्टीचा राग येऊन तनवीर करामत शेख, शराफत अब्बास शेख (वय-57), अब्बास उर्फ साहिल शराफत शेख (वय-18), श्रीम. परवीन शराफत शेख (वय-42), श्रीम. साजमीन शराफत शेख (वय-19) आणि तलाह करामत शेख (वय-26) (सर्व रा. झाराप खान मोहल्ला, ता-कुडाळ) यांनी रुपेश सपकाळ यांना दोरीने बांधून काठी व हाताच्या ठोशांनी बेदम मारहाण केली.
याबाबत सकाळ हिंदू समाजाने निषेध व्यक्त करत. कुडाळ पोलिसांना निवेदन दिले आहे. या निवेदनात असे म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. अशा शुल्लक कारणावरून जर मारहाण होत असेल, तर ती जिल्ह्याची बदनामी आहे. त्यामुळे या घटनेकडे गांभीर्याने बघावे.
मारहाण करणारे सर्व व्यक्ती हे मुस्लिम समाजातील आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आतापर्यंत धार्मिक सलोखा अबाधित राहिला आहे. परंतु अशा व्यक्तींमुळे पुढे जाऊन धार्मिक तणाव निर्माण होऊ शकतो याची शक्यता आहे.
त्यामुळे अशा मुजोर लोकांवर कडक कारवाई करण्यात यावी. असे कृत्य पुन्हा घडू नये आणि कायद्याचा धाक राहावा म्हणून संबंधित स्टॉल/हॉटेल बंद करण्यात यावे.
जर संबंधित लोकांवर कारवाई झाली नाही व पुन्हा अशी घटना घडल्यास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सजग नागरिक आणि सकल हिंदू समाज गप्प बसणार नाही. असे या निवेदनात म्हटले आहे.













