अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या १२ घोषणा
ब्युरो न्यूज: आज झालेल्या केंद्रीय २०२५ च्या देशाच्या अर्थसंकल्पावर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून होते.ह्या अर्थसंकल्पामुळे थोडक्यात सामान्य जनतेच्या डोक्यावरील महागाईचा भार किती कमी होतोय ते आपण पाहुयात.काय आहे २०२५ चा अर्थसंकल्प
1)१२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही आयकर लागणार नाही.
2)अर्थमंत्र्यांनी सांगितले की, पुढील आठवड्यात नवीन आयकर विधेयक आणले जाईल. या प्रत्यक्ष कर सुधारणांबद्दल आम्ही तुम्हाला नंतर सांगू.
3)कर्करोगाची औषधे स्वस्त होतील
4)ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा ५० हजार रुपयांवरून १ लाख रुपये करण्यात आली आहे.
5)आयकर भरण्याची मर्यादा २ वर्षांवरून ४ वर्षे करण्यात आली आहे. गेल्या ४ वर्षांचे आयटी रिटर्न एकत्रितपणे दाखल करता येतील.
6)पुढील ६ वर्षे मसूर आणि तूर यासारख्या डाळींचे उत्पादन वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.
7)किसान क्रेडिट कार्डवरील कर्ज मर्यादा ३ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये करण्यात येईल.
8)बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन केले जाईल, याचा फायदा लहान शेतकरी आणि व्यापाऱ्यांना होईल.
9)लघु उद्योगांसाठी विशेष क्रेडिट कार्ड, पहिल्या वर्षी १० लाख कार्ड जारी केले जातील.
10)एमएसएमईसाठी कर्ज हमी कव्हर ५ कोटी रुपयांवरून १० कोटी रुपये करण्यात आले आहे; १.५ लाख कोटी रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध असेल
11)स्टार्टअप्ससाठी कर्ज १० कोटी रुपयांवरून २० कोटी रुपये केले जाईल. हमी शुल्कातही कपात केली जाईल.
सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 योजना आणली जाणार आहेसूक्ष्म आणि लघू उद्योगांसाठी क्रेडिट गॅरंटी 5 कोटींवरून 10 कोटी करण्यात आली. पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेची घोषणा करण्यात आली. यामुळे 1.7 कोटी शेतकऱ्यांना मदत होणार आहे. कृषी सेक्टरसाठी बजेटमधून मोठ्या घोषणा करण्यात आल्या. तूर, उडीद, मसूर यांचे उत्पादन वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. डाळींमध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी 6 वर्षांचा कार्यक्रम आहे. फळं, भाजी उत्पादकांसाठी विशेष योजनेविषयीची घोषणा करण्यात आली. कापूस उत्पादकांवर भर देण्यासाठी नवीन योजना आणल्या जाणार आहेत.













