संविधान अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असताना ग्रामपंचायत तेर्सेबांबर्डे यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या भारताचे संविधान उद्देशिका देऊन विद्यार्थ्यांचा गुणगौरव

ग्रामपंचायत तेर्सेबांबर्डे येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन गावचे प्रथम नागरिक सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, गावातील सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी, विद्यार्थी, ग्रा.प. कर्मचारी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला.


उपस्थितांच्या माध्यमातून भारत देशाच्या राष्ट्रध्वजाला तसेच हा भारत देश घडवण्याकरता योगदान दिलेल्या सर्व महापुरुषांना मानवंदना देण्यात आली.त्यानंतर राष्ट्रगीत, झेंडा गीत यांचे सादरीकरण झाले विद्यार्थ्यांच्या माध्यमातून गावातील ग्रामस्थांच्या उत्तम संगीत साथीने देशपर गीतांचे गायन करून हा ध्वजवंदन सोहळा संपन्न झाला.
२६ नोव्हेंबर २०२४ ते २६ जानेवारी २०२५ या कालावधीमध्ये संविधान अमृत महोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने गावातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन ७६ वा. प्रजासत्ताक दिन व संविधान अमृत महोत्सवी वर्ष निमित्ताने ग्रामपंचायत तेर्सेबांबर्डे येथे करण्यात आले या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर तेर्सेबांबर्डे गावचे प्रथम नागरिक सरपंच श्री रामचंद्र परब, उपसरपंच सौ रोहिणी हळदणकर, ग्रामपंचायत सदस्य श्री महेंद्र मेस्त्री, सौ माधवी कानडे, श्री अजय डिचोलकर सौ धनश्री गवस, श्रीमती गंधाली परब, श्री गुणाजी जाधव, सौ. प्रणाली साटेलकर, श्री.संतोष डीचोलकर तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य रुपेश कानडे, सौ.रेश्मा परब गावचे पोलीस पाटील श्री रमाकांत जाधव, ग्रामसेवक भूषण बालम या मान्यवरांच्या हस्ते उपस्थित ग्रामस्थ,गावातील सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी, ग्रा. पंचायत कर्मचारी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.

विद्यार्थ्यांना सन्मानित करत असताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने, अथक परिश्रमाने तयार झालेले भारताचे संविधान या संविधानाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये नेहमी तेवत राहावा, संविधान उद्देशिकेमध्ये सांगितल्याप्रमाणे न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता ही मूल्य त्यांच्या अंगी यावी, त्याचे त्यांनी आचरण करावे व भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य व्हावे याकरिता विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत तेर्सेबांबर्डे यांस कडून संविधान उद्देशिका देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान *टीबी मुक्त भारत या भारत सरकारच्या अभियाना अंतर्गत उपस्थित सर्वांकडून शपथ घेण्यात आली व आपला टीबी मुक्त असलेला गाव कायम तसाच टीबी मुक्त राहण्याचा निर्धार सर्वांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला.
त्यानंतर महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत तालुका कृषी अधिकारी कार्यालय व ग्रामपंचायत तेर्सेबांबर्डे यांच्या माध्यमातून आंबा पिकावरील फळमाशी नियंत्रणासाठी लागणारे कामगंध सापळे व ल्यूर्स गावातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना या रक्षक सापळ्यांचे वाटप करण्यात आले.

तेर्सेबांबर्डे ग्रामपंचायतचे स्मार्ट ग्राम स्पर्धेमध्ये उज्वल यश

या कार्यक्रमाच्या दरम्यान सन २०२१/२२ स्मार्ट ग्राम स्पर्धेमध्ये तेर्सेबांबर्डे ग्रामपंचायतने उल्लेखनीय कामगिरी केल्या मुळे तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविल्याने शासन स्तरावरून रुपये दहा लक्ष आपल्या गावासाठी बक्षीस प्राप्त झाले या बद्दल गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचे अभिनंदन केले व पुढील जिल्हा स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

अशा प्रकारे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून 76 वा प्रजासत्ताक दिन व संविधान अमृत महोत्सवी वर्ष तेर्सेबांबर्डे ग्रामपंचायत येथे मोठ्या उत्साहामध्ये साजरे करण्यात आले.

error: Content is protected !!