८ वेतन आयोग निर्णयाला मंजुरी: कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ
दिल्ली: बहुप्रतिक्षित असलेला आठवा वेतन आयोगाचा निर्णय अखेर मंजूर झाला असून लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे.मोदी सरकारनं आज दिनांक १६ जानेवारी रोजी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. सरकारनं आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिल्याची माहिती समोर आलीये. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर देशभरातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची माहिती दिली. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा करण्यासाठी सरकारनं आठवा वेतन आयोगाला मंजुरी दिल्याचं ते म्हणाले.
सातवा वेतन आयोग २०२६ मध्ये संपणार आहे.”१९४७ पासून आतापर्यंत सात वेतन आयोग लागू झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक रेग्युलर पे कमिशन बनवण्याता संकल्प केला होता. ज्याप्रमाणे २०१६ मध्ये सातवा वेतन आयोग सुरू झाला होता. हा २०२६ पर्यंत चालणार होता. परंतु त्याच्या एका वर्षापूर्वीच सरकारनं याला मंजुरी दिली आहे,” असं अश्विनी वैष्णव म्हणाले. दरम्यान, आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची तारीख मात्र अद्याप जाहीर करण्यात आली नसल्याचे ते म्हणाले.













