बीड सरपंच देशमुख हत्या प्रकरणी दोषींवर कारवाई झालीच पाहिजे

सिंधुदुर्ग सरपंच संघटनेचे धरणे आंदोलन..

बीड येथील संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ दोषींवर कारवाई व्हावी या मागणीसाठी सिंधुदुर्ग सरपंच सेवा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले. घडलेली घटना निंदनीय असून त्याचा आम्ही निषेध करतो. आरोपींवर कारवाई होता कामा नये या प्रकारामुळे सरपंच धासावले

सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरपंच संघटनेच्या वतीने बीड येथे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी अद्यापही दोषींवर कारवाई झाली नाही. आरोपी अद्याप अटक झालेला नसून सदर घटना राज्याच्या इतिहासातील अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या घटनेचा निषेध म्हणून तसेच आरोपींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंच संघटनेने सकाळी दहा वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. न्याय मागण्यांबाबत काही माजी सरपंच व अन्य पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले. बीड सरपंच संतोष देशमुख ह लत्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करा या मागणीसह विविध घोषणा देण्यात आल्या.

याबाबत शासन स्तरावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री यांनाही याबाबतची निवेदने पाठविण्यात आली आहेत. या घटनेचा सरपंच संघटनेच्या झालेल्या एका बैठकीत निषेध नोंदवत आला व त्यानंतर जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रवीण गवस यांनी निवेदन सादर केले. यावेळी कसाल सरपंच राजन परब, सरपंच संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष लता खोत, झरेबांबर सरपंच अनिल शेटकर, मोरगाव सरपंच संतोष आईर, रानबाबुळी सरपंच परशुराम परब, ओरोस सरपंच आशा मुरमूरे, उपसरपंच पांडुरंग मालणकर, फुकेरी सरपंच निलेश आईर, बांदिवडे सरपंच अरविंद साटम, पांग्रड सरपंच कावेरी चव्हाण, केरवडे तर्फ माणगाव सरपंच श्रिया ठाकूर, सोनवडे तर्फ हवेली सरपंच नाजुका सावंत, कोळब सरपंच श्रिया धुरी, आंबडोस सरपंच सुबोधनी परब, तारकर्ली सरपंच मृणाली मयेकर , वांयंगवडे सरपंच विशाखा सकपाळ, वायरी भूतनाथ सरपंच भगवान लुडबे, साळेल सरपंच रवींद्र साळकर, देवबाग सरपंच आणि मालवण तालुका सचिव उल्हास तांडेल, ओवळीये सरपंच रंजना पडवळ, मुटापुरी सरपंच बाळकृष्ण गावकर, गावराई सरपंच सोनल शिरोडकर, गोळवन सरपंच सुभाष लाड माजी सरपंच कुंदे सचिन कदम, बाळा कोरगावकर आदीसह उपस्थित होते.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सरपंच संघटना एकवटल्या असून अशा प्रकारचे प्रकार जिल्ह्यात घड्डू नये या दृष्टीने शासनाने गांभीर्याने सरपंचांना सुरक्षा द्यावी. बीड सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी. अशा विविध मागण्यांबाबत घोषणा देण्यात आल्या. व याबाबतचे निवेदन सादर करून जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी शासन स्तरावर पाठविले जाईल असे आश्वासन दिले. त्यानंतर सरपंच संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही निवेदन सादर केले आहे.

error: Content is protected !!