गावातील रानभाज्या ह्या आरोग्य जपतात – सौ अर्चना बंगे

कुडाळ : गावातील रानभाज्या ह्या आरोग्य जपतात त्याच बरोबर गावातील आपले अस्तित्व जपतात असे प्रतिपादन शिवसेनेच्या उध्दव ठाकरे पक्षाच्या पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांनी आज नेरुर येथे रानभाज्या महोत्सव आयोजित कार्यक्रमात केले.
सौ. बंगे म्हणाल्या रान भाज्या ही संकल्पना नेरुर येथील रानमाणुस राजा शृंगारे यांच्या संकल्पनेतून निर्माण झाली. म्हणूनच आज कुडाळ तालुक्यात रान भाज्या प्रदर्शन किंवा बाजार भरवले जात आहेत. ही कौतुकास्पद बाब आहे असेही सौ बंगे यांनी सांगितले.
यावेळी या रानभाज्या महोत्सव उद्घाटन श्री रुपेश पावसकर, जिल्हा परिषद सदस्य यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन यावेळी पंचायत समिती सदस्या सौ दीप्ती नाईक, मा पंचायत समिती सदस्या सौ दीपश्री नेरकर, आणि विविध मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!