आचरा माजी सरपंच जीजा टेमकर यांनी माजी. आ. वैभव नाईक यांचे वेधले होते लक्ष
मालवण तालुक्यातील आचरा गावामधील बीएसएनएल मोबाईल टाॅवर गेल्या पाच दिवसापासून बंद होता.हा मोबाईल टॉवर तात्काळ सुरू करावा अशी मागणी आचरा माजी सरपंच जिजा टेमकर यांच्यासह आचरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने माजी आमदार वैभव नाईक यांच्यापाशी केली होती. माजी आमदार वैभव नाईक यांनी तात्काळ याची दखल घेत बीएसएनएल अधिकारी श्री.गोवेकर यांच्याशी संपर्क साधत बंद असलेला बीएसएनएल टॉवर चालू करण्याच्या सूचना दिल्या. अधिकाऱ्यांनी देखील दखल घेत टाॅवर मधील तांत्रिक बिघाड दुर करुन टाॅवर चालू करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या त्यामुळे गेले कित्येक दिवस बंद असलेला टाॅवर अखेर मंगळवारी पुर्ववत चालु झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.हा टाॅवर चालू व्हावा यासाठी आचरा सरपंच जीजा टेमकर ठाकरे शिवसेना आचरा विभागातील सर्व शिवसैनिक पदाधिकारी यांनी विशेष प्रयत्न केले.