राजापूर लांजा साखरपा मतदार संघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत यांच्या माध्यमातून, ॲड.जमीर खलिफे, अरविंद लांजेकर यांच्या प्रयत्नांना यश
राजापूर : राजापूर शहरातील एसटी डेपोसमोरील उड्डाण पुलाच्या एका बाजूकडील रखडलेले काम पूर्ण होवून पुलाच्या दोन्ही बाजूने वाहतूक सुरू होण्यासाठी माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष ॲड.जमीर खलिफे आणि भाजपाचे अरविंद लांजेकर यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले असून सोमवारपासून उड्डाणपुलावरून दुहेरी वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांतून समाधान व्यक्त होत आहे.
मुंबई गोवा महामार्गावर राजापूर हद्दीतील बहुतांश काम पूर्ण झाले आहे. राजापूर शहरातील डेपोसमोरील उड्डाणपुलाच्या एका बाजूकडील काम काही तांत्रिक अडाणींमुळे रखडले होते. त्यामुळे आजवर पुलाच्या एका बाजूने वाहतूक सुरू होती. पुलाच्या एका बाजूने जाणारी व येणारी वाहने मार्गक्रमण करत असल्याने अपघाताचा धोका होता. त्यामुळे रखडलेले काम पूर्ण करून दोन्ही बाजूने वाहतूक सुरू करावी, अशी मागणी होत होती. याची दखल घेत माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष ॲड.खलिफे आणि भाजपचे अरविंद लांजेकर यांनी महामार्ग विभागाकडे पाठपुरावा केला होता.
अशातच गत महिन्यात उड्डाण पुलाच्या एका बाजूकडील रखडलेले काम सुरू करण्यात आले होते. मात्र ते अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने ॲड.खलिफे यांयासह लांजेकर यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री.कुमावत यांसह सुरू असलेल्या कामी पाहणी करत लवकरात लवकर काम पूर्ण करून वाहतूक सुरू करण्याची मागणी केली होती. तसा आमदार किरण सामंत यांनी देखील काही दिवसांपूर्वी महामार्गाची पाहणी करत तत्काळ उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूने वाहतूक सुरू करण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार सोमवारपासून उड्डाणपुलाच्या दुसऱ्या बाजूनेही वाहतूक सुरू करण्यात आली आहे. राजापूरातील सर्वपक्षीय पदाधिकारी व महामार्ग तसा ठेकेदार कंपन्यांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाहतूक सुरू करण्यात आली. यावेळी दिपक नागले, अरविंद लांजेकर, सुभाष बाकाळकर, शैबाज खलिफे, भरत लाड, अजीम जैतापकर, शैलेश साळवी, लीलाधर गुरव, रवींद्र सावंत, श्री.आंबोळकर यांयासह सार्वजनिक बांधकाम विभागो अभियंता श्री.कुमावत, ठेकेदार कंपनो श्री.मनिंदर व श्री.शर्मा आदी उपस्थित होते.













