राजशिष्टाचार तसेच अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षिततेचे प्रशासकीय अधिकारी म्हणून जबाबदारी नेमकी कोणाची याची पडताळणी करुन पालकमंत्री म्हणून नितेश राणे यांनी धाडस दाखवून कारवाई करावी – कुणाल किनळेकर
सध्या देशात असणाऱ्या हाय अलर्ट परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजकोट येथील भव्य पुतळ्याच्या अनावरणासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात राजशिष्टाचाराचे सर्वच नियम धाब्यावर बसवून स्वागत करणाऱ्या लाचखोर महसूलच्या कर्मचाऱ्यांवर माजी आमदारांनी तक्रार केल्यावरच कारवाई करण्याचे सोपस्कार तर केलेच आहेत. परंतु प्रथम जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्या हस्ते अति महनीय व्यक्तींचे स्वागत करण्याचे काही शासकीय प्रोटोकॉल असतात. शिक्षा म्हणून केवळ निलंबनाची कारवाई झालेले लाचखोर महसूल चे कर्मचारी यांनी ज्यांच्या आशीर्वादाने हे नियम ढाब्यावर बसवले त्या अप्पर जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस काढून चाल ढकल करण्यापेक्षा कठोर कारवाई करण्याची गरज आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लाचखोर निलंबित तलाठ्यांसोबत असणाऱ्या कोणत्या आर्थिक हितसंबंधातून सर्व नियम अटी डावलून मुख्यमंत्री महोदयांचे स्वागत करण्याची संधी यां भ्रष्ट महसूल कर्मचाऱ्यांना दिली त्या अधिकाऱ्यांची खातेनिहाय सखोल चौकशी करावी. तसेच या दोशी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्याचे धाडस दाखवावे.अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेने मार्फत उपजिल्हाध्य कुणाल किनळेकर यांनी दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे.













