कोकण साठी अर्थसंकल्पात काय तरतूद: जाणून घ्या
ब्युरो न्यूज: आज संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून होते ते राज्याच्या अर्थसंकल्पावर.महायुतीच्या या अर्थसंकल्पात शेतकरी,सामान्य माणूस,महिला,बालक यांसाठी काय काय तरतुदी केल्या आहेत याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते.दरम्यान या अर्थसंकल्पात कोकणच्या विकासासाठी काय तरतुदी केल्या आहेत.तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी किती निधी दिला आहे याकडे सिंधुदुर्ग वासियांचे लक्ष लागून राहिले आहे.या अर्थ संकल्पात वाढवण बंदर तसेच सिंधुदुर्ग समुद्र किनाऱ्यांसाठी भरीव तरतूद करण्यात आल्या आहेत.
काय आहे तरतुदी जाणून घ्या;
हवामान बदल आणि समुद्राच्या पातळीत होत असलेल्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या नैसर्गिक आपत्तींपासून बचाव करण्यासाठी महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांमध्ये ८ हजार ४०० कोटी रुपये किंमतीचा बाह्यसहाय्यित प्रकल्प राबविण्यात येणार.
वाढवण बंदर विकासाला गती
• जवाहरलाल नेहरु बंदर प्राधिकरण आणि महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत पालघर जिल्ह्यात वाढवण बंदर विकासाला गती
• या प्रकल्पाचा एकूण खर्च ७६ हजार २२० कोटी रुपये; यात राज्य शासनाचा सहभाग २६ टक्के
• वाढवण बंदरामुळे सुमारे ३०० दशलक्ष मेट्रीक टन वार्षिक मालहाताळणी क्षमता निर्माण होणार;
जवाहरलाल नेहरु बंदराच्या सध्याच्या क्षमतेपेक्षा ती तिप्पट असणारसन २०३० पर्यंत नव्या बंदरातून मालवाहतूक सुरु होणे अपेक्षितया बंदराचा समावेश कंटेनर हाताळणी करणाऱ्या जगातील पहिल्या १० बंदरांमध्ये होणारवाढवण बंदरामुळे महाराष्ट्र भविष्यात सागरी दळणवळणातील महाशक्ती म्हणून उदयास येणारवाढवण बंदराजवळ मुंबईसाठी तिसरे विमानतळ प्रस्तावित
मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचे स्थानकही वाढवण बंदराजवळ असणारवाढवण बंदर समृद्धी महामार्गालाही जोडण्यात येणार
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी काय तरतूद?
■ “महाराष्ट्र शाश्वत पर्यावरण पूरक किनारा संरक्षण व व्यवस्थापन” या ४५० कोटी रुपये किंमतीच्या प्रकल्पांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवबाग येथे १५८ कोटी रुपये किंमतीच्या कामांना मान्यता; या प्रकल्पामुळे समुद्रकिनारी वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे रक्षण होणार













