हिम्मत असेल तर..मंत्री नितेश राणे यांची राज ठाकरेंवर टीका

ब्युरो न्यूज: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यात गंगा नदीत झालेल्या प्रदूषणावरून टिप्पणी केली होती. तसेच, मी गंगा नदीचे पाणी पिणार नाही, असे म्हटले होते. राज ठाकरेंच्या वक्तव्यावर आता मंत्री नितेश राणे यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. एवढीच हिंमत असेल, तर बकरी ईद दिवशी प्रश्न विचारा, असे आव्हान नितेश राणेंनी राज ठाकरेंना दिले आहे.

नेमकं काय म्हणाले नितेश राणे?

नितेश राणे म्हणाले, “बकरी कापून घाण पाणी सोडले जाते, तेव्हा कुणी बोलत नाही. रमजान ईदच्या नावाने मोहम्मद अली रोडवर खाऊन-पिऊन घाण खाली टाकली जाते. सगळे प्रश्न हिंदू समाज आणि धर्माला विचारले जातात. एवढीच हिंमत असेल, तर बकरी ईदच्या वेळी प्रश्न विचारा.”

error: Content is protected !!