कुडाळ : वाघाने केलेल्या हल्ल्यात गाईचा पाडा ठार झाला आहे. ही घटना काल रात्री घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, नेरूर गणेशवाडी येथील आबु चव्हाण यांच्या मालकीच्या गाईच्या पाड्यावर काल वाघाने हल्ला केला. यात त्या पाड्याचा मृत्यू झाला असून शेतकरी आबू चव्हाण यांचे नुकसान झाले आहे.