शिवरायांविषयी अपप्रचार पसरवणाऱ्यांची दुकान बंद केली पाहिजे – ना. नितेश राणे

सावंतवाडी : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करताना चारही बाजूंनी शिवराय हे सेक्युलर राजे होते हे डोक्यात टाकण्याचं छडयंत्र फार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे ज्या राजाला आपण दैवत मानतो त्यांनी स्वराज्य का उभं केलं ? मुघलांशी लढा का दिला ? छ. संभाजी महाराजांनी बलिदान का दिलं ? याचा विचार हिंदूंनी केला पाहिजे. शिवरायांविषयी अपप्रचार पसरवणाऱ्यांची दुकान बंद केली पाहिजे. आपल्या राजाचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर हिंदू म्हणून कडवटपणा, कट्टरपणा अंगीकारण काळाची गरज आहे असं मत पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले. सावंतवाडी येथील विश्व हिंदू परिषद बजरंगदल, शिवप्रेमी व गोरक्षक आयोजित शिवजन्मोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.

पालकमंत्री श्री. राणे पुढे म्हणाले, ज्या राजाला आपण दैवत मानतो त्यांनी स्वराज्य का उभं केलं ? इस्लामिक आक्रमण कशी होती ? याचा विचार करावा. आपल्या माता भगिनींची अब्रू लुटली जात होती. हे बंद करण्यासाठी महाराजांनी लढा दिला. मुघलांशी लढत स्वराज्य स्थापन केले. शिवरायांविषयीचा अपप्रचार हा स्वतःची दुकान चालवण्यासाठी काहीजण करत आहेत. आपल्या राजाचा इतिहास पुसण्याच काम ही मंडळी करत आहेत. ती हिंमत कोणी करत असेल तर हिंदूंनी कडवट भुमिका घेतलीच पाहिजे. कडवटपणा, कट्टरपणा काळाची गरज आहे असं मत व्यक्त केले.

तसेच ‘छावा’ चित्रपट आला नसता तर सगळी आग बाहेर आली नसती. संभाजी राजेंना कसं मारल गेलं हे दाखवलं तेव्हा ती आग बाहेर पडत आहे. पण, दुसऱ्या धर्मात ही गोष्ट करावी लागते का ? इस्लाम बद्दल चित्रपट बनतात का ? महंमद पैगंबराची आठवण करून द्यावी लागते का ? हे खरे प्रश्न आहेत. मुस्लिम, ख्रिश्चन धर्माला धर्म की स्वतः निवडायची वेळ येईल तेव्हा ते धर्म निवडतील. आपण मात्र एकटे पडू. त्यामुळे धर्मांतरणापासून आपल्या भगिनीला वाचवलं पाहिजे. औरंग्यानं संभाजी राजांना धर्म बदलायला सांगितला तेव्हा संभाजी राजांनी दिलेलं उत्तर खुप महत्वाचं आहे. शिवराय, संभाजी राजांनी धर्मासोबत कधीच तडजोड केली नाही. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हिंदू धर्म टिकवण्यासाठी योगदान दिलं. म्हणून, आज आपण शिवजयंती साजरी करू शकतो, मंदिरात जाऊ शकतो. नाहीतर इथे उपस्थित सगळे खान नाहीतर शेख असते. त्यामुळे तो कडवटपणा आपल्यात असलाच पाहिजे असं आवाहन केलं. तर जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून मी सोबत आहे. सरकार हिंदुत्व वादी आहे. त्यामुळे माझ्या हिंदू बांधवांकडे कोण वाकड्या नजरेने पाहत असेल तर त्याचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मंत्री राणेंनी दिला.

दरम्यान, पालकमंत्री म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोहत्या, महिलांकडे वाकड्या नजरेने पाहत असेल तर ते सहन करून घेणार नाही. सिंधुदुर्गात कोणतीही मस्ती खपवून घेणार नाही. अवैध धंदे बंद नाही केले तर फरफटत नेईल, आमचे असतील तर चार फटके अधिक बसतील असा इशारा दिला. तर हिंदू समाजाची सेवा करणं ही आमची जबाबदारी आहे. मला फक्त हिंदूंनीच मतदान केलं. प्रशासनाचा बॉस मीच आहे. मला मॅनेज करण्याएवढी क्षमता कोणाची नाही. गो तस्करी, हिरवे साप वळवळत असतील तर फक्त मला फोन करा. पुढचा कार्यक्रम मी करेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच गप्प बसू नका, अन्याय सहन करू नका. बाजारपेठेतील मस्ती सहन करु नका. अनोळखी चेहरे दिसले तर पोलिसांकडे तक्रार करा. त्यांनी थर्ड डिग्री नाही लावली तर आमची थर्ड डिग्री त्याहून अधिक कडक आहे.शिवरायांबद्दल आमच्या मनात आदर आहे. त्यांना अपेक्षीत हिंदवी स्वराज्यात कोणी हिंदूंची संख्या कमी करण्याच प्रयत्न करू नयेत. २०४७ ला इस्लाम राष्ट्र बनविण्याचे मनसुबे आपण उधळून लावले पाहिजे. आपलं राष्ट्र हिंदू राष्ट्र आहे ते आपणाला भक्कम करायचं आहे.पालकमंत्री नाही तर तुमचा सेवक म्हणून मी उभा आहे असं मत श्री राणेंनी व्यक्त केल.

विश्व हिंदू परिषद बजरंगदल सावंतवाडी, शिवप्रेमी व गोरक्षक सिंधुदुर्गच्या वतीनं शिवजन्मोत्सवाच आयोजन सावंतवाडी येथे करण्यात आलं आहे. गांधी चौक येथे हा कार्यक्रम पार पडला. सुरूवातीला छत्रपतींच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यानंतर मान्यवरांची मनोगत पार पडली‌. मनोगतात माजी मंत्री आ.केसरकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे नौदलाची स्थापना करणारे पाहिले राजे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हणून तो बहुमान आपल्या राजांना दिला आहे. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा असं म्हटलं जातं. कारण, जो औरंगजेब महाराजांना संपवायला महाराष्ट्रात आला होता त्याची कबर याच राज्यात खोदली गेली. त्यामुळे महाराजांचे मावळे देखील किती शूर होते याचा अंदाज येतो. हिंदवी स्वराज्याच स्वप्न पूर्ण करण्याच काम शिवाजी महाराजांनी केलं. महाराष्ट्र त्यांनी दिलेल्या पाऊलवाटेवर मार्गक्रमण करत आहे असं प्रतिपादन दीपक केसरकर यांनी केले.

बजरंगदल क्षेत्र संयोजक विवेक कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील संघर्ष कथन केला. शिवछत्रपती श्रीमंत असूनही योगी होते. समर्थ रामदासांनी तसं वर्णन केल आहे. शिवराय हे धर्मरक्षण करणारे होते. सर्वधर्मसमभाव मानणारे शिवराय होते असं चुकीचं भासवले जात. अफजलखानाचा वध हा धर्माभिमानी असल्याच उदाहरण आहे‌. केवळ दोन उदाहरणे सोडता शिवरायांचे मावळे मुसलमान होते याची नोंद नाही असं मत श्री. कुलकर्णी यांनी व्यक्त केले. तर हिंदू समाज हा उपयोगाच्या मागे धावत आहे. यात आपला समाज घटत आहे. त्यामुळे हिंदूनी हम दो और हमारे किमान तीन असं कुटुंब नियोजन करावं. यातील एक अपत्य स्त्री वा पुरूष अपत्य सैन्याला द्यावं असं आवाहन त्यांनी याप्रसंगी केलं. दरम्यान, या कार्यक्रमाचे औचित्य साधून आरोग्य कर्मचारी दीपक म्हापसेकर यांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री नितेश राणे, माजी मंत्री आ.दीपक केसरकर, विवेक कुलकर्णी, विनायक रांगणेकर, अजित फाटक, चिन्मय रानडे,
कृष्णा धुळपणवर, दिनेश गावडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळ पुराणिक यांनी तर सूत्रसंचालन मितल धुरी हीने केलं. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, संजू परब, सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, अन्नपूर्णा कोरगावकर, स्वागत नाटेकर, अमोल साटेलकर, सुनील पेडणेकर, श्रीपाद सावंत, अँड. राजू कासकर, गुरू मठकर, विराग मडकईकर, श्वेता कोरगावकर, मोहीनी मडगावकर, शर्वरी धारगळकर, अँड. पुष्पलता कोरगावकर, ऐश्वर्या कोरगावकर, साईराज नार्वेकर, किशोर चिटणीस आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!