मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या संवेदनशील स्वभावासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. आज पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय आला आहे. शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबावर असलेला कर्जाचा डोंगर उतरवल्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज देहुमधील कीर्तनकार शिरीष महाराज मोरे यांनी गेल्याच आठवड्यात मंगळवारी आपली जीवनयात्रा संपवली. मृत्यूपूर्वी त्यांनी आपल्यावर ३२ लाखांचे कर्ज असून ते फेडणे शक्य नसल्याने आपण टोकाचे पाऊल उचलल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात होती.
शिरीष महाराज यांच्या कुटुंबाची अडचण पाहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगेच मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या कुटुंबीयांना तब्बल ३२ लाखांची मदत करून कर्जाचा पूर्ण डोंगर उतरवला. त्यांच्या या कृतीमुळे त्यांना अनाथांचा नाथ का म्हटलं जातं या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे.