काश्मीरचे नाव ‘ऋषी…मंत्रीअमित शाह यांचे सूचक विधान
नवी दिल्ली: नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बोलताना काश्मीरचं नाव बदलण्यासंदर्भात सूचक वक्तव्य केलं आहे.खरोखरच केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने असा काही निर्णय घेतला तर तो जम्मू-काश्मीरमधील अनुच्छेद 370 हटवल्याच्या निर्णयापेक्षा मोठा आणि ऐतिहासिक निर्णय ठरेल असं सांगितलं जात आहे. अमित साह यांनी काश्मीरचं नाव बदलून काय ठेवता येईल हे ही आपल्या भाषणात सांगितलं आहे.नवी दिल्लीमध्ये गुरुवारी, ‘जम्मू-काश्मीर आणि लडाखः थ्रू द एजेस’ या पुस्तकाचं प्रकाशन झालं. या प्रकाशन सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. या कार्यक्रामध्ये पुस्तकाचा विषयच जम्मू-काश्मीर असल्याने अमित शाह यांनी या विषयावरच आपल्या भाषणातून जोर दिल्याचं पाहायला मिळालं. या कार्यक्रमात संबोधित करताना शाह यांनी काश्मीरचे नाव बदलण्याचे संकेतही दिले.
अमित शाहांनी सांगितलं नवं नाव
या कार्यक्रमादरम्यान अमित शाह यांनी, “मला आनंद आहे की आज काश्मीर पुन्हा एकदा आपल्या भौगोलिक- सांस्कृतिक राष्ट्र भारताचा अविभाज्य भाग बनला आहे आणि भारतासोबतच विकासाच्या मार्गावर आहे,” असं म्हणत काश्मीरमधील विकासावर भाष्य केलं. “तिथेही लोकशाही प्रस्थापित झाली आहे आणि मला विश्वास आहे की आपण जे काही गमावले आहे ते लवकरच परत मिळेल. आम्हाला पूर्ण विश्वास आहे,” असंही शाह यांनी सांगितलं. पुढे बोलताना त्यांनी, “काश्मीरचे नाव ‘ऋषी कश्यप’ यांच्या नावावर ठेवले जाऊ शकते,” असंही म्हटलं.