वेताळ बांबर्डे येथे वन्य प्राण्यांकडून भातशेतीचे नुकसान

कुडाळ : तालुक्यातील वेताळ बांबर्डे गावामध्ये वन्य प्राण्यांनी अक्षरशः धुडगूस घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

वेताळ बांबर्डे गावातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती असून यावर्षी पाऊस कमी झाल्याने शेतकरी आधीच हवालदिल झाला आहे. अशातच काल नंदकिशोर परब यांच्या शेतात वन्य प्राण्यांनी अक्षरशः धुडगूस घातल्याने त्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे लवकरात लवकर या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.

error: Content is protected !!