३५ वर्षीय युवकाची गळफास घेत आत्महत्या

वेताळ बांबर्डे येथील घटना

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे गावात युवकाने गळफास घेत आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना १५ एप्रिल रोजी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. विजय नारायण कदम असे त्या युवकाचे असून त्याने राहत्या घरी लाकडी वाशाला गळफास घेत आत्महत्या केली. विजय कदम यांचा स्वभाव मनमिळावू होता. परिसरात ते सर्पमित्र म्हणून परिचित होते. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून वेताळ बांबर्डे गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल परुळेकर करीत आहेत.

error: Content is protected !!