कुडाळमध्ये श्री स्वामी समर्थांच्या पालखी व पादुकांचे ६ फेब्रुवारीला आगमन

विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

योगिता कानडे/कुडाळ: अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज अन्नछत्र मंडळातून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही निघालेल्या स्वामींच्या पालखी आणि पादुकांचे शुक्रवार, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी कुडाळ शहरात आगमन होत आहे. या निमित्ताने दोन दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार, ६ फेब्रुवारी २०२६ चे कार्यक्रम:

सायंकाळी ५.०० वा: श्री स्वामी समर्थ मंदिर, नाबरवाडी, कुडाळ येथे पालखीचे आगमन.

सायंकाळी ५.१० वा: नाबरवाडी मंदिर ते बाजारपेठमार्गे महालक्ष्मी हॉलपर्यंत भव्य मिरवणूक.

रात्री ८.०० वा: श्री. विनायक वामन केसरकर (पावशी) यांच्या निवासस्थानी पालखीचे आगमन.

रात्री ८.०० वा: पालखी व पादुकांची षोडशोपचारे पूजा आणि महाआरती.

रात्री ८.३० वा: तीर्थप्रसाद व महाप्रसादास सुरुवात.

रात्री ९.०० वा: सुश्राव्य भजनांचा कार्यक्रम.

शनिवार, ७ फेब्रुवारी २०२६ चे कार्यक्रम:

सकाळी ५.०० वा: अभिषेक व काकड आरती.

सकाळी ९.०० वा: पालखी व पादुका पुढील परिक्रमेसाठी मार्गस्थ होतील.

स्थळ : श्री. विनायक वामन केसरकर, मु. पो. पावशी, ता. कुडाळ.

संपर्क : ९४२३३०४१७१ / ९४२१३०४१७१

आयोजकांच्या वतीने सर्व भाविकांना पालखी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!