कणकवलीचा नागरिक हाच आमचा केंद्रबिंदू.!


शहर विकासाचा दुसरा टप्पा आदर्श शहर असेल

पालकमंत्री नितेश राणे यांचा कणकवली वासियांना विश्वास

मी कॅबिनेट मंत्री,पालकमंत्री असल्यामुळे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री कणकवलीच्या विकासाला देणार विशेष पॅकेज

सुसज्ज नाट्यगृह बनविण्यासाठी 10 कोटींचा प्रस्ताव सांस्कृतिक मंत्रालयाकडे

पोतदार स्कुल मुळे कणकवलीच्या शैक्षणिक सुविधांमध्ये पडली भर

जुने भाजी मार्केटच्या जागी सुसज्ज असे भव्य भाजी मार्केट उभारणार

भाजप विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवतोय

कणकवली : शहराला आणखी विकसित करण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. 5 वर्षांपूर्वी मतदान मागताना नीतेश राणे एक आमदार होता. आता तुमचा आमदार असलेला नितेश राणे राज्यात कॅबिनेट मंत्री आणि सिंधुदुर्ग चा पालकमंत्री आहे. केवळ आमदार असताना कणकवली शहराचा कायापालट केला आहे. आता स्वतः मंत्री आणि जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यामुळे कणकवली शहराच्या विकासकामांसाठी विशेष पॅकेज मागितले तरी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नक्की देतील. फडणवीस सरकारच्या पाठिंब्याचा फायदा कणकवली वासीयांनी घ्यावा आणि कणकवली शहराचा विकास करण्यासाठी भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे आणि सर्व नगरसेवकांना निवडून द्या. असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केले.यावेळी कणकवली नगरपंचायत निवडणूकितील भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे उपस्थित होते.

पुढे बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, राज्यातील सत्तेचा कणकवली च्या विकासासाठी फायदा करून देण्यासाठी आम्हाला सत्तेची साथ द्या. समीर नलावडे आणि भाजपच्या सर्व नगरसेवकांना मत म्हणजे नितेश राणेंना मत, कणकवली च्या विकासाला मत अशा शब्दांत पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली नगरपंचायत निवडणूकीत भाजपाला मतदान करण्यासाठी मतदारांना आवाहन केले. कणकवली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाचे शहर आहे. मागील 5 वर्षांच्या सत्ताकाळात आम्ही केलेले विकासकामे, कणकवलीला आदर्श शहर बनविण्यासाठी घेतलेले निर्णय आणि विकासनिधींचा योग्य विनियोग यामुळे कणकवली शहराचा विकास झाला आहे. कणकवली 2018 पूर्वी कशी होती ? रस्ते कसे होते ? आणि आता कणकवली कशी आहे याचे उत्तर कणकवलीकर स्वतः देतात. रिंग रोडचे जाळे, जानवली नदीवरील पूल यामुळे कणकवली शहर आणखी जवळ आले आहे. खासदार नारायण राणेंच्या आशीर्वादाने पुढील 25 वर्षांचा विचार करून कणकवली शहराचा विस्तार आणि विकास आम्ही करत आहोत. शहरात सुसज्ज नाट्यगृह बनविण्यासाठी 10 कोटींचा प्रस्ताव सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे पाठवला आहे. मराठा मंडळाचे भवन उभारणार असून त्याची पायाभरणी येत्या फेब्रुवारी महिन्यात करणार आहोत. सीबीएसई पॅटर्न चे पोदार इंटरनॅशनल स्कुल मुळे कणकवलीकर आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण देत आहे. पोदार स्कुल मुळे शहराच्या ग्रामीण भागाचा विकास झाला आहे. बाजारपेठ मध्ये आर्थिक उलाढाल वाढली आहे. फ्लायओव्हर मुळे कणकवलीत रहदारी कमी होणार होती पण आम्ही केलेल्या नियोजनामुळे शहरात रहदारी आणि वस्ती वाढली. बारमाही धबधब्यामुळे गणपती साना हा पर्यटन बिंदू झाला आहे. पटवर्धन चौकात असलेले जुने भाजी मार्केट ची जागा नगरविकास खात्याकडे हस्तांतर केली आहे. त्या जागी भव्य भाजी मार्केट, बेसमेंट ला पार्किंग सुविधा देणार आहोत. कणकवली च्या विकासाचा पहिला टप्पा आम्ही पूर्ण केला आहे. पुढील टप्प्यात स्विमिंग, क्रिक्रेट,जॉगिंग ट्रॅकसह सुसज्ज स्पोर्ट कॉम्प्लेक्स उभारणार आहोत. अद्यावत नगरवाचनालय इमारतीचे काम पूर्णत्वास जात आहे. पूढील 5 वर्षांत कणकवली आणखी विकसित करण्यावर भर देणार आहे. कोव्हिड च्या महामारीत भाजपाचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे आणि नगरसेवकांनी कोव्हिडं सेंटर उभारले, गरजू जनतेसाठी मोफत कमळ थाळी सुरू केली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नलावडे आणि आमच्या नगरसेवकांनी जनसेवा केली. खाऊ गल्ली कणकवली पर्यटन महोत्सव सारखे उपक्रम भाजपानेच कणकवली वासियांसाठी सुरू ठेवले. सत्ता असो अथवा नसो, नगरपंचायत वर प्रशासक असतानाही कणकवलीत खाऊ गल्ली, पर्यटन महोत्सव सुरूच ठेवला. सत्ताकाळात कुठल्याही नागरी दाखल्यासाठी समीर नलावडे यांनी अडवल्याचा एक कणकवलीकर दाखवा.समीर नलावडे यांनी कणकवली शहर हे आपले घर मानून जनसेवा केली. विरोधकांनी कितीही टीका केली तरी आम्ही केवळ विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवतोय. कणकवली शहर शांत शहर म्हणून बनविण्यासाठी आम्ही अथक प्रयत्न केले आहेत. त्यामुळे विरोधकांनी कितीही आरोप केले तरी भाजपा कणकवली च्या विकासासाठी मतदारांकडे जाणार आहे.असे ही मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

error: Content is protected !!