कणकवली : नांदगाव-सिसयेवाडी वैभव विलास मोरये (३८) यांनी २६ रोजी विषारी औषध प्राशन केल्याने त्यांना उपजिल्हा रूग्णालय कणकवली येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता जिल्हा रूग्णालय ओरोस व तद्नंतर लागलीच गोवा-बांबुळी येथील जीएमसीमध्ये दाखल करण्यात आले होते.
उपचारादरम्यान वैभव मोरये यांचा मृत्यू झाला. वैभव मोरये यांचा टेम्पो व्यवसाय होता. मात्र, त्याने टोकाचे पाऊल का उचलेले याचे नेमके कारण समजू शकले नाही. काही महिन्यांपूर्वी एका बँकेकडून त्यांनी कर्ज घेत व्यवसाय सुरु केला. व्यवसायात आवश्यक असलेला नफा न झाल्याने काही उसणवार कर्ज घेतल्याचीही सर्वत्र चर्चा आहे.
त्यामुळे वैभव मोरये यांनी कोणाच्या दबावाखाली विषारी औषध कोणत्या कारणातून प्राशन करत जीवनाचा शेवट केला आहे का? जीवन संपविण्यामागे आणखी कुठली कारणे आहेत का? याबाबत पोलीस तपास करणार आहेत. वैभवच्या निधनाचे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्या पश्चात आई, वडील ,आजी, भाऊ, काका असा परिवार आहे.