विरण येथील पोईपला जोडणाऱ्या पुलाची संरक्षक भिंत कोसळली

संतोष हिवाळेकर / पोईप

विरण बाजारपेठेतील पोईपला जोडणारा मालवण बेळणे मुख्य रस्त्यावरील पुलाचा भराव सध्याच्या सतत पडणाऱ्या पावसामुळे संरक्षण भिंत कोसळून वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. हा प्रकार सकाळी अकरा वाजता घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तसेच या रस्त्याची रहदारी अशीच सुरू राहिल्यास संध्याकाळ पर्यंत संपूर्ण रस्ता वाहतुकीस बंद होणार असल्याचे माजी जि. प. बांधकाम सभापती श्री अनिल कांदळकर यांनी स्पष्ट केले.

मालवण बेळणे हा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागमधे येतो . श्री कांदळकर यांच्या म्हणण्यानुसार सदर पुलाचे काम करून पाच वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि असे असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अशा निकृष्ट दर्जाचा कामाचा हा ज्वलंत नमुना आज आम्हाला पाहावा लागतो हे आमचे दुर्दैव आहे रस्ता बंद झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटणार आहे तसेच मालवण ते कणकवली असा हा रस्ता असल्याने या रस्त्याने ये जा करणाऱ्या लोकांना खूप मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. तसेच विरण बाजारपेठ ही फार जुनी बाजारपेठ असून या बाजारपेठेवर अवलंबून दशक्रोशीतील लोक आहेत आणि त्यामुळे डॉक्टर, रेशन, शाळा , कॉलेज, शासकीय कार्यालय तसेच जीवनावश्यक गोष्टींसाठी ये जा करण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय नसल्याने व्यापाऱ्यांचे तसेच ग्राहकांचे ग्रामस्थांचे फार मोठे हाल होणार आहेत. दिवसाचा प्रकार घडल्याने मोठा अनर्थ टळला आहे. तरी सा. बा. विभागाने तात्काळ घटनास्थळी येऊन पाहणी करून तात्काळ पर्याय उपलब्ध करुन द्यावा, व अशा निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर तसेच पाहणी करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. श्री कांदळकर यांच्या म्हणण्यानुसार संरक्षण भिंतीला आवश्यक असणारे फाउंडेशन नसल्याने सदरची संरक्षण भिंत पडली असल्याचे स्पष्ट होत आहे असेच काम होत असल्यास शासनाचा निधीचा दुरुपयोग होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

यावेळी युवासेना उपजिल्हा प्रमुख पंकज वर्दम , शिवसेना शाखाप्रमुख नारायण राणे, विलास पांजरी, रवी कूशे, संदिप कुरो, बांबू वाडकर , यश पांजरी, राजू तिरोडकर, अमित कुशे, पप्पू आंबेडकर, पोलिस पाटील विरण निनाद माडये, पोईप पोलिस पाटील अविनाश जाधव, बबलू वेंगुर्लेकर, प्रसाद जाधव, तसेच मोठ्या संख्येने स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!