नितेश राणेंच्या आदेशानंतर मिरकरवाड्यातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई

रत्नागिरी : मिरकरवाडा येथील अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. याशिवाय मत्स्य विभागाच्या अधिकार देखील दाखल झालेले आहेत. मंत्री नितेश राणे यांनी अनधिकृत बांधकामाबाबत कारवाईच्या आदेश दिले होते. जानेवारीपर्यंत स्वतःहून बांधकाम हटवा, असे आवाहन प्रशासनाकडून केले गेले होते. यानंतर कालपासून (26 जानेवारी) मोठ्या प्रमाणात बांधकाम स्वतःहून देखील हटवलं गेलं आहे. पण त्यानंतर देखील अद्यापही उभ्या असलेल्या अनधिकृत बांधकामांवरती कारवाई केली जाणार आहे.

नितेश राणे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर रत्नागिरीतील मत्स्य विभाग अलर्ट मोडवरती आला आहे. रत्नागिरी शहरापासून जवळ असलेल्या मिरकरवाडा या बंदरावर किरकोळ आणि घाऊक मच्छिविक्री करणारे यांच्यात मच्छिविकण्याच्या जागेवरून वाद आहे. दरम्यान, किरकोळी विक्रेत्यांना बांधून दिलेल्या शेडमधून मच्छिविक्री होत नसल्यानं वाद सुरू होता. शिवाय ग्राहकांना देखील याचा मनस्ताप सहन करावा लागत होता. याबाबत कारवाई करण्याचे आदेश मंत्री नितेश राणे यांनी आपल्या दौऱ्यावेळी दिले होते. त्यानंतर मत्स्य विभागाचे अधिकारी आणि पोलिस सदर जागेवर पोहोचले. यावेळी विक्रेत्यांना कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

error: Content is protected !!