रत्नागिरी : तालुक्यातील उबाठा शिवसेनेचे तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, शाखा प्रमुख, सरपंच यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटाच्या शिवसेनेत दि. 24 जाने. रोजी ना. उदय सामंत यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्याची शक्यता असल्याने हा उबाठा शिवसेनेला मोठा धक्का समजला जाणार आहे. दरम्यान जि. प.चा एक बडा नेताही शिंदे गटाच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडूणकीतील दारूण पराभवानंतर राज्यात अनेक ठिकाणी उबाठा शिवसेनेला धक्केवर धक्के मिळत असताना रत्नागिरी तालुक्यातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याने रत्नागिरी तालुक्यात उबाठा शिवसेनेला मोठे खिंडार पडणार आहे.
