महाराष्ट्रात अवकाळीचे संकट

पुणे आणि विदर्भात अवकाळी पावसाचं संकट निर्माण झालं आहे. पुण्यात हवामान खात्याने पावसाची शक्यता व्यक्त केली असून, त्यात भरीव पाऊस आणि गडगडाट होऊ शकतो. विदर्भातही यावेळी अलर्ट जारी करण्यात आला आहे. तेथील काही भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. शेतकरी आणि नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे, कारण अवकाळी पाऊस शेतमालासाठी हानीकारक ठरू शकतो.

आज सकाळपासून कोकणात देखील वातावरण काहीसे ढगाळ असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आज पहाटे थंडी गायब झाली होती. असे वातावरण कायम राहिल्यास आंबा व काजू पिकला याचा फटका बसू शकतो. त्यामुळे कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

error: Content is protected !!