…जर त्यांनी ओबीसी मधून मराठा आरक्षण देऊ अस लिहून दिलं तर मला नालायक ठरवा

उपमुख्य मंत्री उच्च उच्चांकी जरांगेना आवाहन

मुंबई प्रतिनिधी: विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन आता निवडणूक लढवू नाहीतर मते फोडू अशा भूमिकेत आहेत. दरम्यान एका वृत्त वाहिनिशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणावर विचारले असता जरांगे पाटील यांना आवाहन केले आहे.

अरविंद सावंत यांनी मागितली शायना एन सी यांची जाहीर माफी

यावेळी ते म्हणाले की, मी जरांगे पाटील यांना आवाहन करतो की त्यांनी शरद पवार,उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्याकडून लिहून घ्यावं की त्यांचं सरकार निवडून आल्यावर ते मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देतील. जर त्यांनी असं लिहून दिलं तर मला नालायक ठरवा.त्यांना निवडून आणा आणि त्यांना हार घाला. यावेळी ते पुढे म्हणाले की शरद पवार,उद्धव ठाकरे आणि नाना पटोले मराठा आरक्षणावर बोलायला ही तयार नाहीत तर ते लिहून देणं सोडा.एका ठिकाणीही शरद पवार यांचं स्पष्ट स्टेटमेंट असेल तर मला दाखवून द्या.असे आवाहन यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

शरद पवार ४ वेळा मुख्यमंत्री झाले मग का आरक्षण मिळालं नाही?

ते पुढे म्हणाले की शरद पवार अस कधीही बोलले नाहीत आणि कधीही बोलणार नाहीत. ते पुढे म्हणाले,स्वर्गीय अण्णा पाटील १९८२ साली तत्कालीन काँग्रेस चे मुख्यमंत्र्यांजवळ गेले आणि मराठा आरक्षण दिलं नाही तर मी माझ आयुष्य संपवेन आणि ते न मिळाल्यामुळे स्वर्गीय अण्णा पाटील यांनी स्वतःला गोळी मारून घेतली.त्यानंतर शरद पवार ४ वेळा मुख्यमंत्री झाले तर मग त्यांनी मराठा आरक्षण का मिळवून दिले नाही? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

आज मराठा समाजातील शेकडो मुल आयपीएस, आयएएस होत आहेत

ते पुढे म्हणाले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आम्ही तयार केलं त्यामुळे आज एक लाखापेक्षा जास्त उद्योजक त्यातून तयार झाले आहेत.एवढच नाही तर आम्ही सार्थी ची निर्मिती केली.आज मराठा समाजातील शेकडो मुल आयपीएस, आयएएस होत आहेत हे सर्व आम्ही केलं आहे.असेही ते पुढे म्हणाले.

error: Content is protected !!