उद्यापासून गाव तिथे शिवसेना शाखा अभियान राबविणार

आ.निलेश राणे; पक्ष संघटनेवर विशेष भर

शिवसेना झंझावात ठेवण्याचा आ.निलेश राणे यांनी व्यक्त केला विश्र्वास

मालवण: शिवसेना पक्ष वाढीसाठी उद्यापासून गावतिथे शिवसेना शाखा अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत गावातील संघटना. बूथ सक्षम करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. येत्या काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती. पालिका निवडणुका शिवसेना मोठ्या ताकदीने लढणार असून शिवसेनेचा झंझावात सर्वांना बघायला मिळेल. असा विश्वास आमदार निलेश राणे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.येथील नीलरत्न निवासस्थानी पत्रकार परिषद झाली. यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत. जिल्हा संघटक महेश कांदळगावकर, आनंद शिरवलकर, किसन मांजरेकर आदी उपस्थित होते.आमदार निलेश राणे म्हणाले. राज्यात महायुतीची सत्ता आहे. पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत. जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्षाचे दोन आमदार आहेत. त्यामुळे पक्षाला मोठे बळ आलेले आहे. येत्या काळात अनेक पक्ष प्रवेश शिवसेनेत होणार आहेत.

होऊ घातलेल्या सर्व निवडणुकांना आम्ही सज्ज

पक्ष संघटना वाढविण्याच्या दृष्टिकोनातून उद्यापासून गाव तिथे शिवसेना शाखा हे अभियान सुरू करण्यात येणार आहे. यात गावातील संघटना वाढीबरोबरच बूथ सक्षम करून मतदान कसे वाढेल यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. येत्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती. नगरपरिषद, नगरपंचायत या निवडणुका होत असून या सर्व निवडणुका शिवसेना ताकदीने लढविणार आहे. त्यामुळे येत्या काळात जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शिवसेना आणि शिवसेनेचा झंझावात सर्वांना पाहायला मिळेल. येत्या काळात होऊ घातलेल्या या सर्वच्या सर्व निवडणुकांसाठी आम्ही सज्ज आहोत. शिवसेना पक्षाचे काम पाहून आमच्या नेत्यांवर विश्वास ठेवून अनेक जण पक्षात प्रवेश घेण्यासाठी उत्सुक आहेत. अशा सर्वांना घेऊन आम्ही एकत्र काम करणार आहोत. हे सर्व करत असतानाच आम्ही महायुतीचा एक घटक आहोत ही भावना आहे हा विचारही डोक्यात आहे.

शिवसेनेला गावापर्यंत पोहोचविण्याचे काम करणार

मुख्यमंत्री पदाच्या काळात एकनाथ शिंदे यांनी गेल्या अडीच वर्षात अनेक योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. त्याचा फायदा राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होण्यासाठी झाला आहे. अनेकांना या पक्षात सहभागी होत काम करायचे आहे अशी तळागाळातल्या प्रत्येकाची भावना तयार झाली आहे. या भावनेचा आदर करूनच येणाऱ्या काळामध्ये आम्ही शिवसेनेला गावापर्यंत पोहोचविण्याचे काम करणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जे अभिप्रेत आहे तसा पक्ष आम्ही या जिल्ह्यात वाढविण्याचे काम करण्याबरोबरच सर्व निवडणुका मोठ्या ताकदीने लढवून त्यात यश मिळवू असा विश्वास आ.निलेश राणे यांनी व्यक्त केला. आंग्रे म्हणाले. विधानसभा निवडणुकीसाठी निलेश राणे यांना उमेदवारी मिळाली त्यावेळी शिवसेना पक्षाकडे कार्यकर्त्यांची संख्या फारच कमी होती. त्यांच्या विजयानंतर कुडाळ मालवण मतदारसंघात शिवसेना पक्ष भक्कम झाला आहे. सावंतवाडी मध्येही शिवसेनेचे आमदार आहेत. कोकण विभाग आणि मुंबई याची जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार निलेश राणे यांच्यावर सोपविली शिवसेना पक्ष वाढवून देण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात होणाऱ्या ज्या ज्या निवडणुका असतील त्या सर्व निवडणुकांमध्ये ७० टक्के ही शिवसेनाच असेल.

मतदारसंघाचा येत्या काळात कायापालट निश्चित

उद्यापासून गाव तेथे शाखा आणि घर तेथे शिवसैनिक असे अभियान सुरू करण्यात येत आहे. त्यानंतर शिवसेनेचा एक महामेळावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. आमदार निलेश राणे. दीपक केसरकर, उदय सामंत. किरण सामंत. रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत घेतला जाईल. येणारी प्रत्येक निवडणूक ही शिवसेना म्हणून आम्ही लढवणार आहोत. निवडून आल्यानंतर आमदार निलेश राणे यांनी विकास कामांचा धडाका लावला आहे. गेल्या दहा वर्षात जी कामे मार्गी लागली नव्हती ती आता मार्गस्थ होत आहेत. त्यामुळे या मतदारसंघाचा येत्या काळात कायापालट निश्चितच होईल. विकासाची गंगा येण्याबरोबरच रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. त्याचबरोबर पक्ष संघटनाही वाढविण्यासाठी मंत्री राणे यांचे योगदान राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महायुतीचा धर्म आम्ही पाहणार

सामंत म्हणाले. महायुतीचा धर्म आम्ही पाहणार आहोत. त्यामुळे येत्या काळात शिवसेना पक्षात ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांना प्रेमाने आम्ही पक्षात घेणार आहोत कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते फोडण्याचे काम आम्ही करणार नाही.पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपल्याला पक्षात काम करायचे असेल अशी ज्यांची भावना असेल त्यांच्या भावनांचा आदर करून त्यांना पक्षात प्रवेश दिला जाईल. येत्या काळात होऊ घातलेल्या सर्व निवडणुकांमध्ये शिवसेनेचे वर्चस्व राहील अशी आपली भावना आहे.

error: Content is protected !!