रत्नागिरी समुद्र किनाऱ्यावर असणार ड्रोनची नजर

रत्नागिरीतील समुद्रकिनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सरकारचा मोठा निर्णय;

रत्नागिरी: रत्नागिरी समुद्र किनाऱ्याच्या सुरक्षेसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला असून दिनांक ९ जानेवारी पासून रत्नागिरीतील मीरकवाडा आणि साखरीनाटे समुद्रकिनाऱ्यासाठी 2 ड्रोन तैनात करण्यात आले आहेत. ड्रोनद्वारे आता अवैध मासेमारीवर लक्ष ठेवणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या समुद्रक्षेत्रात होणारी परप्रांतीय नौकांची घुसखोरी आणि अवैध मासेमारी रोखण्यासाठी आता ड्रोनचा वापर केला जाणार आहे. राज्यातील 7 सागरी जिल्ह्यांसाठी 9 ड्रोन मिळणार असून आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील मीरकवाडा आणि साखरीनाटे किनाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन मिळणार आहेत. 9 जानेवारीपासून ड्रोनची गस्त सुरू होणार आहे.

error: Content is protected !!