मैत्रिणीने तक्रार दिल्याच्या नैराश्यातून विद्यार्थ्यांची आत्महत्या

चिठ्ठीतून उलघडले आत्महत्येचे कारण

मैत्रिणीने तक्रार दिल्याच्या नैराश्यातून सावंतवाडी आयटीआय मध्ये शिकणाऱ्या हुमरस येथील विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. गणेश प्रकाश नायर (वय १९) असे त्याचे नाव आहे. दरम्यान “आई-बाबा मला माफ करा, मी कोणाला दोषी धरत नाही. मात्र मैत्रिणीने तक्रार दिली. त्यामुळे मी हा निर्णय घेत आहे”, असे त्यांनी लिहीलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे. त्यामुळे आता पोलीस नेमकी पुढील भूमिका काय घेतात? हे पाहणे आवश्यक ठरणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गणेश हा युवक आयटीआय मध्ये शिकत आहे. आज दुपारी घरी आल्यानंतर त्याने बैल आणायला जातो, असे घरात सांगुन निघून गेला. त्या नंतर तो बराच वेळ घरी आला नाही. त्यामुळे घरातील व्यक्तींनी शोधाशोध केली असता घराच्या बाजूला असलेल्या झाडावर त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. दरम्यान त्याच्या खिशात असलेल्या चिठ्ठीत आई-बाबा मला माफ करा, माझ्या मृत्यूला कोणाला जबाबदार धरू नका, माझ्या मैत्रिणीने माझ्या विरोधात पोलिस तक्रार केली. त्यामुळे मी हे पाऊल उचलत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्या सर्व प्रकारातून त्याने हा प्रकार केला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. त्यानुसार कुडाळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उद्या त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवसापूर्वी त्याच्या मैत्रिणीने सावंतवाडी पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार दिली होती. त्यानुसार त्याला समज देण्यात आली होती. या नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असावी, असा त्याच्या नातेवाईकांचा आरोप आहे.

error: Content is protected !!