१ नोव्हेंबर पासून होणार बदल
कुडाळ प्रतिनिधी: ऐन दिवाळी सणात कोकण रेल्वे चे वेळापत्रक बदलले असल्यामुळे प्रवशांची तारांबळ उडणार आहे. जर तुम्ही कुठे फिरायला जाणार असाल तर मग कोकण रेल्वे चे हे नवीन वेळापत्रक नक्कीच वाचा.
करमाळी- लोकमान्य टिळक टर्मिनल (२२११६) एक्स्प्रेसचा कणकवली स्थानकात १० मिनिट उशिरा म्हंजे सांयकाळी ४:२२ ऐवजी ४:३२ मिनिटांनी पोहचणार आहे.७ नोव्हेेंबरपासून हा बदल लागू होणार आहे.
महायुती व महविकस आघाडीचा असा आहे जागा वाटपाचा फॉर्म्युला
त्याचप्रमाणे वास्को द गामा – पटणा (१२७४१) एक्स्प्रेसची रत्नागिरी स्थानकावर पोहोचण्याची सुधारित वेळ रात्री १२:३५ वाजता असणार आहे. तर मुंबई सीएसएमटी ते मडगाव जंक्शन मांंडवी एक्स्प्रेस नडवली स्थानकात दुपारी ४ वाजून ५ मिनिटांनी पोहचणार आहे. या गाड्यांचा समावेश लोकमान्य टिळक टर्मिनल – मंगळुरू सेंट्रल मत्स्यगंधा एक्स्प्रेस चिपळूण स्थानकावर सायंकाळी ७:४२ वाजता पोहचेल. १ नोव्हेंबरपासून हे वेळापत्रक लागू होणार आहे. एर्नाकुलम जंक्शन – अजमेर (१२९७७), कोचुवेली – पोरबंदर एक्स्प्रेस ( २०९०९), भावनगर – कोचुवेली (१९२६०) तसेच पोरबंदर ते कोचुवेली (२०९१०) एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल केल्याचे कोकण रेल्वेने कळविले आहे.













