राजापूर प्रतिनिधी: राजापूर तालुक्यातील धोपेश्वर तिठवली येथील आंबा बागेत नेपाळी कामगाराने अज्ञात कारणातून आंबा बागेत गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवार 7 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 ते रविवार 8 डिसेंबर रोजी दुपारी 3.30 वा. कालावधीत घडली आहे.बिरेंद्र बहादूर बगाले मगर (20, मुळ रा. कैलाला, नेपाळ सध्या रा. धोपेश्वर तिठवली, राजापूर) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या नेपाळी कामगाराचे नाव आहे. याबाबत बाग मालकाने राजापूर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार, बिरेंद्र हा त्यांच्या आंबा बागेत कामाला होता. शनिवारी सायकाळ ते रविवारी दुपारच्या कालावधीत त्याने अज्ञात कारणातून बागेतीलच एका आंबा झाडाच्या फांदीला पिवळ्या रंगाच्या दुपट्ट्याने गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी राजापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
1
/
89
यांना आताच्या आता सभेतून बाहेर काढा आमदार निलेश राणे संतापले | Nilesh Rane #nileshrane
पालकमंत्री नितेश राणे यांना एक महिन्याची शिक्षा, व एक लाखाचा दंड! #niteshrane #sindhudurg
पालकमंत्री नितेश राणे यांच्या टोल माफीच्या भूमिकेचे स्वागत! - वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhavnaik
एम.एच. ०७ च्या कोणत्याही गाडीला टोल लागणार नाही #niteshrane #sindhudurg
तुमच्या आंदोलनात धमक नाही!" – वैभव नाईक यांचा निलेश राणेंना टोला #vaibhavnaik #nileshrane
सिंधुदुर्गवासीयांनी टोल विरोधात एकत्र येण्याची गरज - नगराध्यक्ष संदेश पारकर #sindhudurg #kankavali
कुडाळ पंचायत समितीची आमसभा २७ एप्रिल रोजी #kudal
नितीन गडकरी सिंधुदुर्गात आले आणि जिल्हावासियांना टोलची भेट देऊन गेले - वैभव नाईक
ज्यांचे राजकीय धर्मांतर झाले आहे त्यांनी आम्हाला हिंदुत्वाचे सर्टिफिकेट देऊ नये - नितेश राणे
सिंधुदुर्ग जिल्ह्याची विकासाकडे घौडदौड !
युवा प्रतिष्ठान अध्यक्ष केतन शिरोडकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
योगेश मोबाईल शॉपीचा नवा धमाका एका मोबाईवर १० हजारांपर्यंत आकर्षक बक्षिसे #kudal #sindhudurg #mobile
1
/
89


Subscribe









