तिलारी नदीच्या घोटगेवाडी पुलावरून २ व्यक्ती गेले वाहून

तिलारी नदीच्या घोटगेवाडी पुलावरून अज्ञात व्यक्ती वाहून गेल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. कोनाळ कट्टा येथील उपसरपंच रत्नकांत करपे यांनी दोन व्यक्ती वाहून जात असल्याचा व्हिडिओ पाठवला आहे.

तिलारी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने घोटगेवाडी येथील पूल पाण्याखाली गेला आहे. याच पाण्याच्या प्रवाहात दोन अज्ञात व्यक्ती वाहून गेल्याचे समोर आले आहे. नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने मदतकार्य करणे शक्य नसल्याचे करपे यांनी सांगितले.

दरम्यान, ग्रामस्थांच्या सहकार्याने नदीकाठी शोधकार्य हाती घेण्यात आले आहे. मात्र, अद्याप दोन्ही व्यक्तींचा ठावठिकाणा लागलेला नाही. यामध्ये एका लहान मुलाचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, प्रशासनाकडून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

error: Content is protected !!