पदांपेक्षा पक्षाचे विचार आणि राष्ट्राचे विचार पुढे नेण्यासाठी काम करा – आमदार प्रमोद जठार

दोडामार्गच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी बळ देणार

दोडामार्ग : भारतीय जनता पक्षाने मला विधानपरिषदेत पाठवून जनतेची सेवा करण्याची आणि प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली आहे.पक्षाच्या वरिष्ठांचे आणि नेतृत्वाचे आभार मानतो.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानतो.यापुढेही भारतीय जनता पार्टी चे विचार पुढे नेण्यासाठी जोषात काम सुरु ठेवणार आहे, भारतीय जनता पक्षाचे विचार पुढे नेण्यासाठी कार्यकर्ते नेटाने काम करत आहेत.आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आपण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत.पद मिळाले नाही तर नाराज होऊ नका.पदांपेक्षा पक्षाचे विचार आणि राष्ट्राचे विचार पुढे नेण्यासाठी काम करा.असे प्रतिपादन आमदार प्रमोद जठार यांनी केले.

ते दोडामार्ग येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी व्यासपीठावर
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, तालुकाध्यक्ष दीपक गवस, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, सभापती पार्वती गवस, पं. स. सदस्य संजय सातार्डेकर, सोनिया कुबल, दिक्षा महालकर, राजेश फुलारी, देवेंद्र शेटकर, रंगनाथ गवस, प्रवीण गवस, आकांशा शेटकर, अंकुश नाईक, भैया पांगम, संध्या प्रसादी, संजना म्हावळकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते होते.

यावेळी विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर प्रथमच सिंधुदुर्गात दोडामार्ग येथे आलेल्या आमदार प्रमोद जठार यांचा दोडामार्ग तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुष्पहार आणि पुष्पगुच्छ, देऊन सत्कार केले.आणि स्वागत केले.

यावेळी पुढे बोलताना श्री.जठार म्हणाले की,ज्यांना पद मिळाले त्यांनी नम्र राहायला शिका.त्याग करायला शिका.अनेक प्रवाहाचे लोक पक्षात येतात.पक्षात आलेले आपले आहेत.जूने नवे असे वाद करायचे नाहीत.प्रमोद तु आमदार झालास आम्ही आमदार झाल्यासारखं वाटतं.असे अनेक जण मला सांगतात.कार्यकर्त्यांच्या पुण्याईवर पक्ष चालतो.आता आम्ही सत्तेत आहोत.
आता आंदोलन करणारे कार्यकर्ते नको,आता सोलुशन देणारे कार्यकर्ते झाले पाहिजे.स्वभाव बदला असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.अंतिम माणसाला सुखी समाधानी करायचं आहे.दोडामार्गच्या विकासाला बळ देणार असून दोडामार्ग चा बॅक लाॅग भरुन काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, प्रमोद जठार यांचे नेतृत्व विधानपरिषदेत पोहोचणे ही काळाची गरज होती. 2008 सालापासून त्यांनी जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारून भाजप संघटना मजबूत केली. 2009 मध्ये ते आमदार झाले. त्यानंतर अनेक राजकीय घडामोडी झाल्या, मात्र त्यांनी कधीही हार मानली नाही.

ते पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत भाजप कमळ चिन्हावर विजय मिळवण्यासाठी मोठी मेहनत घेण्यात आली. खा. नारायण राणे यांच्या विजयामागे प्रमोद जठार यांचे योगदान महत्त्वाचे आहे. आगामी काळातही पक्षाचा विजय शतप्रतिशत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.
यावेळी कार्यकर्त्यांनी जठार यांचे जल्लोषात स्वागत केले.कार्यकर्त्यांनी प्रमोद जठार तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, भारतीय जनता पार्टी चा विजय असो, वंदे मातरम्, भारत माता की जय, जय श्रीराम अशा घोषणा दिल्या.

error: Content is protected !!