मुंबई प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीत मनसेला राज्यात खातं देखील उघडता आलं नाही. गेल्यावेळी मनसेचा एक आमदार निवडून आला होता, मात्र यावेळी मनसेचे आमदार राजू पाटील यांचा देखील पराभव झाला. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा देखील पराभव झाला. दरम्यान याच पराभवामुळे आता अविनाश जाधव यांनी मोठा निर्णय घेतला आहे.त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.याबाबत त्यांनी फेसबुक पोस्ट करत माहिती दिली आहे.
अविनाश जाधव यांनी नेमकं काय लिहिलं आहे.
विषय : जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देणेबाबत…
विधानसभा निवडणुकीत ठाणे व पालघर येथे पराभवाची जबाबदारी घेऊन मी माझ्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. काम करताना माझ्याकडून कळत नकळत काही चूक झाली असल्यास आपण मला माफ करावे.’ अशी पोस्ट अविनाश जाधव यांनी फेसबुकवर केली आहे.