ग्रामपंचायत सडूरे शिराळेच्या हद्दीतील जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांच्या पालकांना एक वर्षासाठी घरपट्टी माफ व शैक्षणिक कामासाठी लागणारे दाखले मोफत मिळणार…
ग्रामअधिकारी प्रशांत जाधव यांनी केली अधिकृत घोषणा
जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या घट झाली असून या पार्श्वभूमी वरती लोकप्रतिनिधी या नात्याने गावातील शाळेमध्ये पटसंख्या वाढाव्या या अनुषंगाने ग्रामपंचायतच्या वतीने नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना घरपट्टी माफ व शाळेतील कामांसाठी लागणारे दाखले मोफत मिळाव्यात अशी मागणी उपसरपंच नवलराज काळे यांनी गेले काही दिवसापूर्वी केली होती. या मागणीची दखल घेत ग्रामपंचायत प्रशासनाने दखल घेत या मागणीची पूर्तता केली असून आज रोजी झालेल्या कार्यक्रमांमध्ये ग्रामपंचायतीचे ग्राम अधिकारी प्रशांत जाधव यांनी या योजनेची जाहीर घोषणा केली. यावेळीवाभवे वैभववाडी नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी उमेश स्वामी,सरपंच दीपक चव्हाण उपसरपंच नवलराज काळे, वाभवे वैभववाडी नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी उमेश स्वामी, ग्रामपंचायत सदस्य रोशनी बाणे, मुख्याध्यापिका अमृता मॅडम, सह शिक्षक आवटे सर, शाळा समिती अध्यक्ष सौ.जंगम मॅडम, अंगणवाडी सेविका जागृती रावराणे, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेतील नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी बोलत असताना ग्राम अधिकारी प्रशांत जाधव यांनी उपसरपंच नवलराज काळे यांनी केलेल्या मागणीचा उल्लेख करत नवीन प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना एक वर्षासाठी मोफत घरपट्टी व शैक्षणिक कामासाठी लागणारे ग्रामपंचायत दाखले मोफत देण्यात येतील याबाबतची घोषणा करण्यात आली. यावेळी उपसरपंच नवलराज काळे यांनी ग्राम पंचायत प्रशासनाचे आभार मानले. यावेळी बोलत असताना उपसरपंच नवलराज काळे यांनी जिल्हा परिषद शाळा फक्त अभ्यास शिकवत नसून संस्कृती घडवतात जिल्हा परिषद शाळेतून शिकून गेल्यावरती विद्यार्थ्यांचा पाया मजबूत होतो आणि म्हणूनच गावातील पालकांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेचे शिक्षण द्यावं. उत्तम प्रकारचे शिक्षण आपल्या ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक देतात उत्तम प्रकारचे इंग्लिश देखील आपल्या शाळेमध्ये शिकवलं जातं त्यामुळे फक्त अभ्यासच नव्हे तर जीवनामध्ये नव्या उमेदीने जीवन जगण्याचा वेगळा संकल्प जिल्हा परिषद शाळेतून शिकायला मिळतो त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेतूनच शिक्षण द्यावे असे आवाहन केले. जिल्हा परिषद शाळेचे संवर्धन होण्यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने ज्या गोष्टी आम्हाला करता येतील या दृष्टिकोनातून आम्ही वाटचाल करू आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद शाळेत जास्तीत जास्त पटसंख्या कशा होतील याकडे सुद्धा लक्ष केंद्रित करू यावेळी शाळेतील शिक्षकांनी राबवलेला उपक्रम उत्तम होता शासनाकडून आलेले मुलांसाठी भेटवस्तू म्हणून गणवेश, सॉक्स,बूट, पाठ्यपुस्तक वह्या या गोष्टींचं वाटप करून शाळेच्या वतीने उपस्थितीना गोड खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी अंगणवाडीतील सर्व विद्यार्थ्यांना श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने वह्या व पेन देण्याचे आश्वासन ट्रस्टचे अध्यक्ष तथा उपसरपंच नवलराज काळे यांनी यावेळी दिले.