वेताळ बांबर्डे येथील बॉक्सवेल बनतेय तळीरामांचा अड्डा

कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गाचे चौपदरीपकरण झाले आणि दळणवळण क्षेत्रात एक मोठी क्रांती घडली. एकंदरीत मुंबई – गोवा महामार्गाचे चौपदरीपकरण हा कोकण विकासाच्या एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. याच मुंबई – गोवा महामार्गावर वसलेल्या वेताळ बांबर्डे गावातील बॉक्सवेल सध्या तळीरामांचा अड्डा बनत आहे.

दारूच्या बाटल्या, कोल्ड्रिंक्स तथा प्लॅस्टिकच्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या आदींमुळे हा परिसर विद्रूप दिसत आहे. दारूची बॉटल फुटून लोकांच्या पायाला लागून दुखापत देखील होऊ शकते. शिवाय हा महत्त्वाचा बस थांबा असल्यामुळे अनेक शालेय विद्यार्थी याच ठिकाणी थांबतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या मनावर देखील याचे दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे या सर्व गोष्टींबाबत प्रवाशांसह स्थानिक ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!