महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत केली जाणारी हप्ते वसुली नेमकी कोणासाठी?
माजी आमदार वैभव नाईक यांचा सवाल
सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सातत्याने बैठका घेऊन वेगवेगळे आदेश पालकमंत्री नितेश राणे सोडत आहेत.मात्र कोणत्याच अधिकाऱ्यांना त्यांचा भय राहिलेला नाही हे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेतील हयगय प्रकरणानंतर पुन्हा एकदा लाच प्रकरणात दिसून आले आहे. कुडाळ महावितरण कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता विजय नरसिंग जाधव यांना ५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. पालकमंत्री आणि सत्तारूढ आमदारांचे प्रशासनावर वचक नसल्यामुळेच वरिष्ठ अधिकारी राजरोस लाच स्वीकारत आहेत अशी टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर दोन दिवसात हि लाचखोरी झालेली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत लाच घेऊन केली जाणारी हप्ते वसुली नेमकी कोणासाठी केली जात आहे असा सवालही वैभव नाईक यांनी उपस्थित केला आहे.
वैभव नाईक म्हणाले, महावितरण हा नागरिकांच्या दृष्ठीने महत्वाचा विभाग आहे.महावितरणकडे नागरिकांची अनेक वीज संबंधित कामे असून महावितरणच्या बाबतीत नागरिकांच्या अनेक तक्रारी देखील येत आहेत. पालकमंत्री नितेश राणे, कुडाळचे आमदार निलेश राणे आणि जिल्हाधिकारी यांनी नुकत्याच जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या त्यात महावितरणचे हे अधिकारी देखील उपस्थित होते. महावितरणच्या अधिकाऱ्यांना वीज संबंधित लोकांचे प्रश्न सोडविणाच्या सूचना देण्यात आल्या मात्र याला दोन दिवस उलटताच सोलार पॅनलच्या चेकलिस्टवर सही करण्यासाठी महावितरण कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता विजय नरसिंग जाधव यांनी ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली आणि लाच घेताना त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. खरंतर शेतकरी आणि नागरिकांना सोलार वीज निर्मितीकडे वळण्याचे आवाहन सरकार कडून केले जात आहे. मात्र सोलार बसविण्यासाठी वरिष्ठ अधिकारी लाच मागत असतील तर सरकारचा उद्देश कसा सफल होणार? महावितरणचे अधिकारी हे नागरिकांकडून आणि ठेकेदारांकडून लाच घेत असल्यानेच कामे दर्जेदार केली जात नाही त्यामुळे कालच्या वळवाच्या पावसात महावितरणचा बोजवारा उडाला त्यामुळे मालवण तालुका २५ तास काळोखात आहे. लाचखोरीचा फटका थेट नागरिकांना बसत आहे. त्यामुळे महावितरणच्या लाच प्रकणाची सखोल चौकशी करून त्याला आळा घालणे गरजेचे आहे. असे वैभव नाईक म्हणाले आहेत.
1
/
104
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे -तृप्ती धोडमिसे
शाळेत भरला गावठी बाजार; विद्यार्थ्याने आणली कोंबडी! #sindhudurg
पोलिसांनी मार खावा का ? अभिजीत दीपकेंना आ. निलेश राणेंकडून प्रत्युत्तर #nileshrane
चक्क ८२ वर्षांच्या आजीने घेतला धबधब्यात पोहण्याचा आनंद #sindhudurg
आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६ ला उत्साहात सुरुवात #marethone
सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल रुग्णांवर डिस्चार्ज व बांबुळी रेफरसाठी दबाव #sindhudurg
सताधाऱ्यांच्या फसव्या घोषणाना जनता बळी पडणार नाही #sindhudurg
१५ ऑगस्टपर्यंत मासेमारीवर बंदी - नितेश राणे | Nilesh Rane #niteshrane
उद्धव साहेबांनी बाळासाहेबांचे विचार सोडले
आमची सगळी टीम सकारात्मकतेने काम करतेय - निलेश राणे |Nilesh Rane #nileshrane
1
/
104


Subscribe










