सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १३ शाळांची पीएमश्री शाळांमध्ये निवड

पीएमश्री शाळा ठरणार रोल मॉडेल

काय आहे पीएमश्री शाळा योजना?;जाणून घ्या

मुंबई: राज्यात नवे सरकार आल्यापासून शिक्षण क्षेत्रात अनेक महत्वाचे आणि विकासपूर्ण बदल घडले आहेत.अशाच आता अजून एका योजनेची चर्चा चालू आहे.ती म्हणजे पीएमश्री शाळा योजना.या योजने अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील काही शाळांना मुख्याध्यापक, शिक्षकांची वर्गनिहाय, विषयनिहाय पदे भरण्याचे निर्देश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने दिल्याने पीएमश्री शाळा रोल मॉडेल ठरणार आहेत.या शाळांमध्ये नियुक्त मुख्याध्यापक, शिक्षकांना सुमारे पाच वर्षांपर्यंत पीएमश्री शाळांमध्ये स्थैर्य मिळणार असल्याचे शिक्षण विभागाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

एकूण ८२७ शाळांची निवड

या योजनेअंतर्गत राज्यातील पहिल्या टप्प्यातील ५१६ आणि दुसऱ्या टप्प्यातील ३११ अशा एकूण ८२७ शाळांची निवड करण्यात आली आहे.या शाळा उत्तम गुणवत्तेच्या दृष्टीने मार्गदर्शक ठरतील अशा पद्धतीने विकसित केल्या जाणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतुदींची पीएमश्री शाळांमध्ये प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. पीएमश्री शाळांना नजीकच्या शाळांना समानता, समतापूर्ण आणि आनंदायी वातावरणात उच्च गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी मार्गदर्शक शाळा म्हणून नेतृत्व करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात येत आहे.

पीएमश्री शाळांची भूमिका काय?

मुख्याध्यापक प्रमुख घटकपालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्तम सहसंबंध प्रस्थापित करून त्यांचा सहभाग आणि शिक्षणासाठी आनंदपूर्ण वातावरण निर्मिती करणे, तसेच विविध प्रशिक्षणामध्ये सहभागी होणे, प्रशिक्षण आणि कार्यशाळा आयोजित करणे, योजनेची सुलभ अंमलबजावणी करणे यात मुख्याध्यापकांची महत्त्वपूर्ण भूमिका, जबाबदारी आहे. शाळा विकसन आणि सातत्यपूर्ण नेतृत्व करण्यासाठी मुख्याध्यापक हा प्रमुख घटक आहे. या पार्श्वभूमीवर २२ एप्रिलला केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अनिलकुमार सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा सभा झाली. त्यात पीएमश्री शाळांमध्ये मुख्याध्यापक, शिक्षकांची रिक्त पदे भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्हानिहाय पीएमश्री शाळा

अकोला- ११, अमरावती १८, औरंगाबाद ११, बीड- १३, भंडारा- १२, गोंदिया- १३, हिंगोली ५, जळगाव १८, लातूर- १३, नागपूर- २१, नांदेड- १८, नंदुरबार – ८, पालघर- ११, परभणी ११, बुलडाणा- २२, चंद्रपूर- १८, उस्मानाबाद ९, नगर २१, गडचिरोली- १६, कोल्हापूर- १८, नाशिक-२६, पुणे- २३, रायगड २०, रत्नागिरी १३, सांगली- १४, सातारा – १८, सिंधुदुर्ग- १३, सोलापूर २३, ठाणे १४, वर्धा- १३, वाशिम – ७, यवतमाळ- २६, धुळे- ७, जालना १२

पाच वर्षांपर्यत बदली नाही

रिक्त पदे भरल्यास पीएमश्री शाळांमध्ये सातत्यपूर्ण आणि प्रभावी पद्धतीने गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठीची अंमलबजावणी करता येईल. त्यामुळे पीएमश्री शाळा विशिष्ट स्तरापर्यंत पोहोचून इतर शाळांना मार्गदर्शक ठरतील. यादृष्टीने पीएमश्री शाळांतील मुख्याध्यापक, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी आवश्यक शिक्षकांची वर्गनिहाय, विषयनिहाय पदे भरणे, संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक चार ते पाच वर्षे त्याच शाळेत नियमित राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

error: Content is protected !!