प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली समानतेच्या मार्गावर भारत अधिक बळकट होईल —नवलराज काळे.
प्रतिनिधी : जातिनिहाय जनगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय म्हणजे नव्या भारताचं नवसंवेदनशील पाऊल!सर्वसमावेशक विकासाची नवी दिशा असेल,देशातील प्रत्येक घटकाची ओळख, गरज व हक्क ठळकपणे अधोरेखित करणारा हा निर्णय असेल देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली समानतेच्या मार्गावर भारत देश अधिक बळकट होईल असा विश्वास भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हा प्रभारी नवलराज काळे यांनी व्यक्त करत केंद्र सरकारने घेतल्या या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत केले आहे.
केंद्र सरकारने जातिनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्री मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय केवळ एक आकडेवारी पुरवणारा उपक्रम नसून, तो प्रत्येक समाजातील वंचित, दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. या निर्णयामुळे योजनांची आखणी अधिक प्रभावीपणे करता येईल आणि सामाजिक न्यायाच्या तत्वांना अधिक बळ मिळेल. कित्येक वर्षाची मागणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पूर्ण होत आहे या देशाचा नागरिक म्हणून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असल्याचा सार्थ अभिमान वाटतो असे नवलराज काळे यांनी प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.