मविआच्या महाराष्ट्रनाम्यात आश्वासनांची लयलूट!

महिलांना मासिक पाळीत २ दिवस रजा

आरक्षणाची ५०% मर्यादा हटवणार

ब्युरो न्यूज: निवडणुकीची रणधुमाळी आणि आश्र्वासानांचा पाऊस हे समीकरण कायम गाजत राहील आहे.यंदाच्या निवडणुक हंगामात महिलांच्या सक्षमीकरनावर जास्त भर दिला असल्याचं चित्र दिसून येत आहे.विधानसभा निवडणुक पार्श्वभूमीवर आज भाजपा नंतर महाविकास आघाडीकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. मविआच्या या जाहीरनाम्याला ‘महाराष्ट्रनामा’ असे नाव देण्यात आले आहे. मल्लिकार्जुन खरगे आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मविआचा महाराष्ट्रनामा प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्यात आश्वासनांची लयलूट करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आल्यास महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या दोन दिवस ऐच्छिक रजा देणार अशी घोषणा जाहीरनाम्यात केली आहे.

महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात काय?

-शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी,नियमित कर्जफेड करणाऱ्यास 50 हजारांची सूट
-आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा आम्ही हटवणार
-जाती जणगणनना करणार
⁠-300 युनिट वीज वापरणाऱ्यांना 100 युनिट वीज मोफत
-दोन लाख सरकारी पदे भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करणार
-महिला, लहान मुले-मुली यांच्यासाठी ‘निर्भय महाराष्ट्र’ धोरण आखणार, तसेच ‘शक्ती’ कायद्याची अंमलबजावणी करणार
-2.5 लाख नोकरभरती करणार
-शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उच्चस्तरीय समिती
-शेतमालाला हमीभाव देणार,पीकविम्याच्या जाचक अटी काढणार
-सुशिक्षीत बेरोजगारांना दरमहा 4 हजार मानधन
-अडीच लाख सरकारी नोकऱ्यांची भरती सुरु करणार
-बार्टी,महाज्योती,सारथीमार्फतची शिष्यवृत्ती वाढवणार
-एमपीएससी परीक्षांचे निकाल 45 दिवसांत लावणार
-महात्मा फुले आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवणार
-महायुती सरकारचे पक्षपाती अध्यादेश रद्द करणार
-महायुती सरकारने खाजगी व्यक्तींना दिलेल्या भूखंडांवर फेरविचार करु
-शहरीकरणाला दिशा देण्यासाठी राज्य नागरी आयोग स्थापन करणार
-सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार
⁠-डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक बनवणार
-महिलांसाठी एक्सक्लुझिव्ह इंडस्ट्री स्थापन करणार
-बिनाव्याज पाच लाख कर्ज देणार
-कंत्राटी नोकरभरती बंद करणार
-महायुती सरकारने पक्षपाती भूमिकेतून काढलेल्या अध्यादेशांचा फेरविचार करणार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार, या निवडणुका एकसदस्यीय प्रभाग पद्धतीने घेणार
-सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार
-शिवभोजन थाळी योजना केंद्रांची संख्या वाढविणार
-जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने पावले उचलणार
-वीजग्राहकांचा विरोध लक्षात घेऊन प्रीपेड मीटर्स योजनेचा आढावा घेणार
-युवकांच्या कल्याणासाठी ‘युवा आयोगा’ची स्थापना करणार

महाविकास आघाडी पहिल्या 100 दिवसांत काय करणार?

-महालक्ष्मी योजनेंतर्गत महिलांना दरमहा 3 हजार रु.देणार
-महिलांचा बस प्रवास मोफत करणार
-सहा घरगुती गॅस सिलेंडर 500 रुपयांत देणार
-महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या दोन दिवस ऐच्छिक रजा देणार
-जन्मास आलेल्या प्रत्येक मुलीस 18 वर्षे पूर्ण केल्यानंतर 1 लाख रुपये देणार.

error: Content is protected !!