सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात अजूनही ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण
ब्युरो न्यूज: राज्य शासनाने स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया सक्तीची केली आहे.मात्र अद्यापही बहुतेक जिल्ह्यांमध्ये ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली नाही आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हा उपक्रम राबवला जात असला तरी, अद्याप 30% लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही.त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांचा धान्य पुरवठा बंद करण्यात येईल, असा इशाराच आता प्रशासनाने दिला आहे. ई-केवायसी प्रक्रियेत पुणे जिल्हा सर्वात मागे असल्याचे स्पष्ट झाले आहे.राज्यात 70% ई-केवायसी पूर्ण,
गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने अंतिम मुदत वाढवूनही राज्यातील केवायसी प्रमाण 70% वरच थांबले आहे. ठाणे, भंडारा आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये चांगली प्रगती दिसून आली असली तरी पुणे जिल्ह्यात केवळ 54.42% ई-केवायसी पूर्ण झाली आहे, ज्यामुळे तो राज्यात सर्वात मागे आहे.
सर्वाधिक अपूर्ण ई-केवायसी असलेले जिल्हे
पुणे: 46.58%
परभणी: 39.83%
बीड: 38.08%
नागपूर: 37.87%
नांदेड: 37.33%
धुळे: 36.89%
धाराशिव: 36.44%
जळगाव: 36.04%
नंदुरबार: 35.38%
लातूर: 35.04%
हिंगोली: 34.58%
सिंधुदुर्ग: 34.19%
ई-केवायसीसाठी अंतिम मुदत कोणती?सुरुवातीला 1 नोव्हेंबर ही अंतिम तारीख देण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने तीन ते चार वेळा मुदतवाढ दिली असून आता 15 मार्च ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे.













